शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

दुध दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 7:01 PM

मानोरी : दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेत पिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढणीपर्यत मोठा खर्च करून ही शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.

ठळक मुद्देशेती बरोबर दुग्ध व्यवसाय करणे देखील आवाक्या बाहेर

मानोरी : दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेत पिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढणीपर्यत मोठा खर्च करून ही शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.त्यातच वाढती महागाई विचारात घेता शेती म्हणजे एक प्रकारे जुगार खेळल्यासारखा प्रकार होत आहे. म्हणून ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. दूध दरवाढी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलनानंतरही दुधाला 18 ते 20 रु पयापर्यंत भाव मिळत असल्याने गायीच्या दूध वाढीसाठी घेतलेल्या खाद्याचा खर्च देखील फिटत नसल्याने शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करणे देखील आवाक्या बाहेर झाले आहे.ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करत आहेत. गेल्या एक वर्षांपासून दुधाच्या दरात सतत घसरण झाली आहे. शासनाने शेतकरी व दुध उत्पादकांचे ही दुधाच्या दरात मोठी घसरण करून सर्व सामान्य शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची दुध व्यवसायची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्च ही भरून निघणे कठीण झाले आहे. दूध स्वस्त, पाणी महाग या अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कामे जवळपास संपले असून दूध व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकºयांनी शेतात जेमतेम पाण्यावर गाईना खाण्यासाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करत आहे. परंतू या चाºयाची वाढ होणार नसल्याने उभ्या असलेल्या चाºयात गायी बांधून देत आहे. त्यामुळे दूध वाढीसाठी केलेला खर्च करून ही दूधाचे दर जैसे थे च आहे. आॅक्टोबर हिटमुळे उन्हाची लाट तीव्र असून चारा सुकण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनी तर केव्हाच तळ गाठला असल्याने पाणी द्यायचे कुठुन हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.दूध वाढीसाठी अनेक प्रकारचे औषधे, ढेप, सरकी सारख्या खाद्यवस्तू खरेदी करतात. ढेपीच्या पन्नास किलो पोत्याच्या दर एक हजार रु पयांवर गेले आहे. गाईला एक ढेपीचे पोते साधारण दहा ते बारा दिवस जाते.त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे शेतकरी सांगत आहे. येथील दुधाला गुजरात राज्याबरोबर बारामती, सिन्नर आदी सारख्या मोठ्या शहरात दूध निर्यात होत आहे.दुधाला प्रति लिटर २५ रुपयांच्या पुढे भाव मिळणे गरजेचे असून गेल्या वर्षभरात दुधाच्या भावात सातत्याने घसरण झाली असून, इथुन पुढेही ही परिस्थिती कायम राहिली तर शेतकºयांना दूध नक्कीच पुन्हा रस्त्यावर ओतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.आनंदा शेळके, दुग्ध उत्पादक.