शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:30 IST

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो, मिरची रोपांची मागणी रोडावली त्यामुळे पदरमोड करीत रोपे तयार करावे की नाही असा संभ्रम रोपवाटिका चालकांना पडला आहे.कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ रोपवाटिका चालकांवर आली आहे.साधारणपणे अक्षय्यतृतीयेनंतर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत व आसपासच्या परिसरात तसेच, येवला तालुक्याला लागून असलेल्या रवंदा भागात नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावरती व निफाड-लासलगाव भागात टोमॅटो व मिरची लागवडीला सुरु वात होते, परंतु यंदा कोरोनामुळे शेतकरीच संभ्रमात आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून रोपवाटिका चालकांकडे रोपे तयार करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. हंगामात चांगली मागणी राहील या आशेवर बºयाच रोपवाटिका चालकांनी मिरची व टोमॅटोची रोपे आगाऊ तयार करून ठेवली होती, परंतु कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिका चालकांना हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली.सर्वसाधारणपणे १५ ते २० मे पर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या रोपे तयार करण्याच्या आॅर्डर आलेल्या असतात व अ‍ॅडव्हान्स म्हणून ५० टक्के पैसेही जमा झालेले असतात, परंतु यंदा अजूनपर्यंत पाच-दहा टक्केही शेतकºयांनी रोपांची आॅर्डर दिलेली नाही. काही रोपवाटिका चालकांनी सगळं सुरळीत होईल असा विचार करून नर्सरी बांधकाम करून ठेवले आहे. तर काही आता दिवस जवळ आले आहेत, मिळतील तेवढ्या आॅर्डर्ससाठी का होईना नर्सरीच्या कामाला लागावे असा विचार करून नर्सरी तयार करीत आहेत, परंतु यंदा ३०-४० टक्केही आॅर्डर मिळते की नाही या संभ्रमात नर्सरी चालक आहेत.-------------------------------कृषी विभागही पडला पेचातशेतकºयांनाही अजून टोमॅटो आणि मिरची लागवड करायची की नाही हा निर्णय घेता येत नाही. आतापर्यंत एक ते दोन टक्के टोमॅटो, मिरची लागवड झालेली आहे, जी दरवर्षी ३० ते ४० टक्के झालेली असायची. कृषी विभागालाही शेतकºयांना याबद्दल काय मार्गदर्शन करावे आणि कसे टोमॅटो, मिरची लागवडीसाठी प्रवृत्त करावे असा पेच पडला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर टोमॅटो आणि मिरचीचा मोठा तुटवडा भासेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक