शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:30 IST

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो, मिरची रोपांची मागणी रोडावली त्यामुळे पदरमोड करीत रोपे तयार करावे की नाही असा संभ्रम रोपवाटिका चालकांना पडला आहे.कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ रोपवाटिका चालकांवर आली आहे.साधारणपणे अक्षय्यतृतीयेनंतर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत व आसपासच्या परिसरात तसेच, येवला तालुक्याला लागून असलेल्या रवंदा भागात नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावरती व निफाड-लासलगाव भागात टोमॅटो व मिरची लागवडीला सुरु वात होते, परंतु यंदा कोरोनामुळे शेतकरीच संभ्रमात आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून रोपवाटिका चालकांकडे रोपे तयार करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. हंगामात चांगली मागणी राहील या आशेवर बºयाच रोपवाटिका चालकांनी मिरची व टोमॅटोची रोपे आगाऊ तयार करून ठेवली होती, परंतु कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिका चालकांना हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली.सर्वसाधारणपणे १५ ते २० मे पर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या रोपे तयार करण्याच्या आॅर्डर आलेल्या असतात व अ‍ॅडव्हान्स म्हणून ५० टक्के पैसेही जमा झालेले असतात, परंतु यंदा अजूनपर्यंत पाच-दहा टक्केही शेतकºयांनी रोपांची आॅर्डर दिलेली नाही. काही रोपवाटिका चालकांनी सगळं सुरळीत होईल असा विचार करून नर्सरी बांधकाम करून ठेवले आहे. तर काही आता दिवस जवळ आले आहेत, मिळतील तेवढ्या आॅर्डर्ससाठी का होईना नर्सरीच्या कामाला लागावे असा विचार करून नर्सरी तयार करीत आहेत, परंतु यंदा ३०-४० टक्केही आॅर्डर मिळते की नाही या संभ्रमात नर्सरी चालक आहेत.-------------------------------कृषी विभागही पडला पेचातशेतकºयांनाही अजून टोमॅटो आणि मिरची लागवड करायची की नाही हा निर्णय घेता येत नाही. आतापर्यंत एक ते दोन टक्के टोमॅटो, मिरची लागवड झालेली आहे, जी दरवर्षी ३० ते ४० टक्के झालेली असायची. कृषी विभागालाही शेतकºयांना याबद्दल काय मार्गदर्शन करावे आणि कसे टोमॅटो, मिरची लागवडीसाठी प्रवृत्त करावे असा पेच पडला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर टोमॅटो आणि मिरचीचा मोठा तुटवडा भासेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक