शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:30 IST

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो, मिरची रोपांची मागणी रोडावली त्यामुळे पदरमोड करीत रोपे तयार करावे की नाही असा संभ्रम रोपवाटिका चालकांना पडला आहे.कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ रोपवाटिका चालकांवर आली आहे.साधारणपणे अक्षय्यतृतीयेनंतर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत व आसपासच्या परिसरात तसेच, येवला तालुक्याला लागून असलेल्या रवंदा भागात नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावरती व निफाड-लासलगाव भागात टोमॅटो व मिरची लागवडीला सुरु वात होते, परंतु यंदा कोरोनामुळे शेतकरीच संभ्रमात आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून रोपवाटिका चालकांकडे रोपे तयार करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. हंगामात चांगली मागणी राहील या आशेवर बºयाच रोपवाटिका चालकांनी मिरची व टोमॅटोची रोपे आगाऊ तयार करून ठेवली होती, परंतु कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिका चालकांना हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली.सर्वसाधारणपणे १५ ते २० मे पर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या रोपे तयार करण्याच्या आॅर्डर आलेल्या असतात व अ‍ॅडव्हान्स म्हणून ५० टक्के पैसेही जमा झालेले असतात, परंतु यंदा अजूनपर्यंत पाच-दहा टक्केही शेतकºयांनी रोपांची आॅर्डर दिलेली नाही. काही रोपवाटिका चालकांनी सगळं सुरळीत होईल असा विचार करून नर्सरी बांधकाम करून ठेवले आहे. तर काही आता दिवस जवळ आले आहेत, मिळतील तेवढ्या आॅर्डर्ससाठी का होईना नर्सरीच्या कामाला लागावे असा विचार करून नर्सरी तयार करीत आहेत, परंतु यंदा ३०-४० टक्केही आॅर्डर मिळते की नाही या संभ्रमात नर्सरी चालक आहेत.-------------------------------कृषी विभागही पडला पेचातशेतकºयांनाही अजून टोमॅटो आणि मिरची लागवड करायची की नाही हा निर्णय घेता येत नाही. आतापर्यंत एक ते दोन टक्के टोमॅटो, मिरची लागवड झालेली आहे, जी दरवर्षी ३० ते ४० टक्के झालेली असायची. कृषी विभागालाही शेतकºयांना याबद्दल काय मार्गदर्शन करावे आणि कसे टोमॅटो, मिरची लागवडीसाठी प्रवृत्त करावे असा पेच पडला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर टोमॅटो आणि मिरचीचा मोठा तुटवडा भासेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक