शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अपु-या पावसामुळे बागलाणमध्ये भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:46 IST

नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपु-या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपुºया पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.बागलाणला टंचाईचे आठ महिने काढायचे आहेत.असे भीषण जलसंकट उभे ठाकले असतांना दुसरीकडे दररोज टॅँकरच्या संख्येत होणारी वाढ ,नदी काठच्या गावांची पाण्याच्या आवर्तनासाठी होत असलेली मागणी या भयावह परिस्थितीमुळे प्रशासनाची चांगलीच कसरत होतांना दिसत आहे. बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे आॅक्टोबरपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.पावसाळ्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ बागलाण वासीयांवर येऊन ठेपली आहे.परतीच्या पावसासाठी देखील होमहवन ,यज्ञ करण्यात आले.मात्र वरु ण राजा पावला नाही.तरी देखील बेमोसमी पाऊस तरी बरसेल परंतु तो देखील बरसला नाही.यामुळे भीषण जलसंकट उभे असून १९७२ पेक्षाही यंदा भीषण दुष्काळ असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत.विहिरीला जेमतेम पाणी आहे .म्हणून रब्बी कांद्याचे बियाणे टाकले रोपही उतले.रोप लावले आण िविहिरीचे पाणी आटल्याने शेकडो एकर कांद्याचे पिक सोडून देण्याची वेळ बागलाण मधील बहुतांश शेतकºयांवर आली आहे.यामुळे थोडीफार पुंजी जपून ठेवली तीही गेल्याने शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला आहे.बहुतांश शेतकºयांनी मक्याचा पेरा केला .एक पाऊस आला.नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने पुलोर्यातच पिक करपले.बाजरी ,सोयाबीनचीही हीच अवस्था,जनावरांना आणि माणसांना आज हंडाभर पाणी विहिरीत साचतेय परंतु पुढचे आठ महिने कसे जाणार,माणूस कुठूनही पाण्याची तहान भागवेल जनावरांचे काय या विवंचनेत शेतकरी रोज मरतांना दिसत असल्याचे भीषण दुष्काळाचे वास्तव बागलाण मध्ये अनुभवायला मिळत आहेत.यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक