शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपु-या पावसामुळे बागलाणमध्ये भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:46 IST

नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपु-या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपुºया पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.बागलाणला टंचाईचे आठ महिने काढायचे आहेत.असे भीषण जलसंकट उभे ठाकले असतांना दुसरीकडे दररोज टॅँकरच्या संख्येत होणारी वाढ ,नदी काठच्या गावांची पाण्याच्या आवर्तनासाठी होत असलेली मागणी या भयावह परिस्थितीमुळे प्रशासनाची चांगलीच कसरत होतांना दिसत आहे. बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे आॅक्टोबरपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.पावसाळ्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ बागलाण वासीयांवर येऊन ठेपली आहे.परतीच्या पावसासाठी देखील होमहवन ,यज्ञ करण्यात आले.मात्र वरु ण राजा पावला नाही.तरी देखील बेमोसमी पाऊस तरी बरसेल परंतु तो देखील बरसला नाही.यामुळे भीषण जलसंकट उभे असून १९७२ पेक्षाही यंदा भीषण दुष्काळ असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत.विहिरीला जेमतेम पाणी आहे .म्हणून रब्बी कांद्याचे बियाणे टाकले रोपही उतले.रोप लावले आण िविहिरीचे पाणी आटल्याने शेकडो एकर कांद्याचे पिक सोडून देण्याची वेळ बागलाण मधील बहुतांश शेतकºयांवर आली आहे.यामुळे थोडीफार पुंजी जपून ठेवली तीही गेल्याने शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला आहे.बहुतांश शेतकºयांनी मक्याचा पेरा केला .एक पाऊस आला.नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने पुलोर्यातच पिक करपले.बाजरी ,सोयाबीनचीही हीच अवस्था,जनावरांना आणि माणसांना आज हंडाभर पाणी विहिरीत साचतेय परंतु पुढचे आठ महिने कसे जाणार,माणूस कुठूनही पाण्याची तहान भागवेल जनावरांचे काय या विवंचनेत शेतकरी रोज मरतांना दिसत असल्याचे भीषण दुष्काळाचे वास्तव बागलाण मध्ये अनुभवायला मिळत आहेत.यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक