शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:52 IST

मानोरी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येवला तालुक्यात मागील दोन दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरदेखील उष्णतेचा परिणाम होत आहे. मानोरी बुद्रुक, देशमाने, वाहेगाव, मुखेड फाटा आदि परिसरात शुक्रवारी तपमानाने चाळीशी पार केल्याने जनावरांना गोचीड ताप , भुळकंड आणि अशक्तपणाची लागण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आधीच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेली असताना त्यात वाढत्या तपमानाने भर घातली आहे. उन्हाच्या तीव्रतेत भरमसाठ वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असताना जनावरांना गोचीड तापाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांच्या शरीराचे तपमान उन्हामुळे १०५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून या गोचीड तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन हजार रु पयांहून अधिक खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीच्या उत्पादनातून एक रुपयाही फायदा झालेला नसून त्यात दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपयांचा दर मिळत असल्याने त्यातून जनारांच्या खाद्याचा खर्चही वसूल होत नसल्याने जनावरांचा गोचीड ताप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती पशुतज्ज्ञ डॉ. संदीप शेळके यांनी दिली. या वाढलेल्या तपमानामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या दुग्ध उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच ऐन दुष्काळात जनावरे सांभाळणे आवाक्याबाहेर झालेले असताना महागड्या दराने चारा खरेदी करून शेतकरी दुग्ध व्यवसाय शेतकरी करीत आहेत. या गोचीड तापामुळे दररोज दुध उकीरड्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतक-यांवर ओढवली आहे. उन्हाची स्थिती पुढील काही दिवस अशीच राहिल्यास जनावरे दगावण्याची देखील भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे चाळीशी पार केलेल्या तपमानात पुढील काही दिवस जनावरांची निगा राखणे शेतक-यांसाठी कसरतीचेच ठरणार आहे.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघात