शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:52 IST

मानोरी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येवला तालुक्यात मागील दोन दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरदेखील उष्णतेचा परिणाम होत आहे. मानोरी बुद्रुक, देशमाने, वाहेगाव, मुखेड फाटा आदि परिसरात शुक्रवारी तपमानाने चाळीशी पार केल्याने जनावरांना गोचीड ताप , भुळकंड आणि अशक्तपणाची लागण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आधीच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेली असताना त्यात वाढत्या तपमानाने भर घातली आहे. उन्हाच्या तीव्रतेत भरमसाठ वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असताना जनावरांना गोचीड तापाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांच्या शरीराचे तपमान उन्हामुळे १०५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून या गोचीड तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन हजार रु पयांहून अधिक खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीच्या उत्पादनातून एक रुपयाही फायदा झालेला नसून त्यात दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपयांचा दर मिळत असल्याने त्यातून जनारांच्या खाद्याचा खर्चही वसूल होत नसल्याने जनावरांचा गोचीड ताप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती पशुतज्ज्ञ डॉ. संदीप शेळके यांनी दिली. या वाढलेल्या तपमानामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या दुग्ध उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच ऐन दुष्काळात जनावरे सांभाळणे आवाक्याबाहेर झालेले असताना महागड्या दराने चारा खरेदी करून शेतकरी दुग्ध व्यवसाय शेतकरी करीत आहेत. या गोचीड तापामुळे दररोज दुध उकीरड्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतक-यांवर ओढवली आहे. उन्हाची स्थिती पुढील काही दिवस अशीच राहिल्यास जनावरे दगावण्याची देखील भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे चाळीशी पार केलेल्या तपमानात पुढील काही दिवस जनावरांची निगा राखणे शेतक-यांसाठी कसरतीचेच ठरणार आहे.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघात