शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वातावरणातील असमतोलामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:41 IST

वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे.

वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्षपंढरी म्हणून दिंडोरी तालुका परिचीत असून कसदार व पोषक जमीन पाण्याचे स्त्रोत यामुळे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे. विविध जातीची द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर असुन नवनवीन अद्यावत तंत्राचा वापर करून परराज्यात तसेच परदेशात नावलौकीक प्राप्त केला आहे, मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना वेगळ्याच अस्मानी संकटाला सामोरे जावे लागते आहे. गत काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढले होते, त्याबरोबर ढगाळ हवामानाने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले थंडीचे प्रमाण सद्यस्थितीत तुलनात्मकरित्या कमी झाले असले तरी ढगाळ हवामानाच्या समस्येने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा वातावरणात भुरी मिलीबग अशा रोगांना आमंत्रण मिळते तर द्राक्षातील साखरवाढीवर याचा प्रतिकुल परिणाम होतो सर्वसाधारण स्थितीत द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ टक्के किंवा त्यापुढे पाहिजे मात्र आता १३ टक्के एवढेच प्रमाण काही भागात असल्याची माहिती काही उत्पादकांनी दिली.परप्रांतातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष खरेदीसाठी उत्सुक आहेत, मात्र प्रतिकुल वातावरणामुळे द्राक्षबागा पूर्णत: परिपक्व होण्यास अडचणी येत आहेत. अपवावात्मक स्थितीत काही द्राक्षबागाची खुडणी सुरू आहे, मात्र दराबाबत घासाघीस करावी लागते आहे.दरम्यान नोटबंदीच्या सुलतानी फटक्याच्या विळख्यात सर्वच उद्योगधंदे सापडल्याचे चित्र दिसते आहे. त्यात शेतीव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे जाणवत असताना द्राक्ष उत्पादक आता सुलतानीबरोबर अस्मानी संकटात सापडला आहे. वर्षभराचे शेतीचे नियोजन उदरनिर्वांहाची तरतुद, मुलांची शैक्षणिक जबाबदारी, विवाह या सगळ्या बाबींची पूर्तता करताना द्राक्ष उत्पादनावर व विक्र ी करून मिळालेल्या पैशावर उत्पादकांचे नियोजन असते मात्र आता प्रतिकुल हवामानापुढे हतबल झालेले उत्पादक रोगप्रतिबंधासाठी एकरी दहा हजाराचा खर्च फवारणीसाठी करीत आहेत. सदरची चिंताजनक बाब उत्पादकांची कसोटी पाहणारी असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.