शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आखाजी सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:50 IST

अडचणींत वाढ : झोक्यावरची गाणीही विस्मृतीत

ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत

मेशी : वैशाख महिन्यातील आणि उन्हाळी सुट्टीतील सर्वात मोठा सण म्हणजे अक्षयतृतीया आहे. ग्रामीण भागात या सणाला आखाजी असे म्हटले जाते. परंतु, या सणावर यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत.गावोगावी आखाजीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने या सणाच्या आनंदावर विरजन फिरवले आहे. पूर्वी महिला आणि मुलींची गौराईची गाणी जवळपास महिनाभर अगोदर पासून झोक्यावर बसून गायली जायची. या गाण्याच्या चाली सर्वत्र ऐकू येऊ लागल्या की आखाजी सणाची चाहूल लागत असे. उन्हाळ्यात शेतीची सर्व कामे संपलेली असत. याशिवाय मुलांना सुट्टया असल्याने आजोळी किंवा आपल्याच गावी सणाची मजा लुटली जायची. पाणी भरपूर असे त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवायची नाही. मात्र, आता सण साजरा करण्याच्या परंपरेच फरक पडत चाललेला दिसून येत आहे. बागाईती शेतीमुळे कामे वाढली असून मुलांचे देखील सुट्टयांमध्ये वेगवेगळे शिकवणी वर्ग आता सुरू झाले आहेत. गौराईची गाणी म्हणणारा महिला वर्ग कमी कमी होत चालला आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने तर पूर्ण चित्रच बदलले आहे. शहरातील नोकरी व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेला पुरूष वर्ग देखील आता गावाकडे येणे टाळतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने साजरा होणाऱ्या आखाजी सणाची गोडी आता काहीशी कमी होत चालली आहे. त्यातच यंदा दुष्काळाची धग प्रचंड असल्याने शिवाय महागाईही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचे सावट या सणावर दिसून येत आहे.आमराई नामशेषनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच शेतीपिकांना बसत आला आहे. यंदा निसर्गाच्या याच लहरीपणामुळे आमराईवर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादनावरही परिणाम झाला असून त्याचा फटका आखाजीला बसला आहे. घरोघरी गौराईची स्थापना देखील कमी होऊ लागली आहे. एकेकाळी कसमादे परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा हा सण आता केवळ औपचारिकता ठरत चालला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक