शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आखाजी सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:50 IST

अडचणींत वाढ : झोक्यावरची गाणीही विस्मृतीत

ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत

मेशी : वैशाख महिन्यातील आणि उन्हाळी सुट्टीतील सर्वात मोठा सण म्हणजे अक्षयतृतीया आहे. ग्रामीण भागात या सणाला आखाजी असे म्हटले जाते. परंतु, या सणावर यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत.गावोगावी आखाजीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने या सणाच्या आनंदावर विरजन फिरवले आहे. पूर्वी महिला आणि मुलींची गौराईची गाणी जवळपास महिनाभर अगोदर पासून झोक्यावर बसून गायली जायची. या गाण्याच्या चाली सर्वत्र ऐकू येऊ लागल्या की आखाजी सणाची चाहूल लागत असे. उन्हाळ्यात शेतीची सर्व कामे संपलेली असत. याशिवाय मुलांना सुट्टया असल्याने आजोळी किंवा आपल्याच गावी सणाची मजा लुटली जायची. पाणी भरपूर असे त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवायची नाही. मात्र, आता सण साजरा करण्याच्या परंपरेच फरक पडत चाललेला दिसून येत आहे. बागाईती शेतीमुळे कामे वाढली असून मुलांचे देखील सुट्टयांमध्ये वेगवेगळे शिकवणी वर्ग आता सुरू झाले आहेत. गौराईची गाणी म्हणणारा महिला वर्ग कमी कमी होत चालला आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने तर पूर्ण चित्रच बदलले आहे. शहरातील नोकरी व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेला पुरूष वर्ग देखील आता गावाकडे येणे टाळतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने साजरा होणाऱ्या आखाजी सणाची गोडी आता काहीशी कमी होत चालली आहे. त्यातच यंदा दुष्काळाची धग प्रचंड असल्याने शिवाय महागाईही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचे सावट या सणावर दिसून येत आहे.आमराई नामशेषनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच शेतीपिकांना बसत आला आहे. यंदा निसर्गाच्या याच लहरीपणामुळे आमराईवर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादनावरही परिणाम झाला असून त्याचा फटका आखाजीला बसला आहे. घरोघरी गौराईची स्थापना देखील कमी होऊ लागली आहे. एकेकाळी कसमादे परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा हा सण आता केवळ औपचारिकता ठरत चालला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक