शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आखाजी सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:50 IST

अडचणींत वाढ : झोक्यावरची गाणीही विस्मृतीत

ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत

मेशी : वैशाख महिन्यातील आणि उन्हाळी सुट्टीतील सर्वात मोठा सण म्हणजे अक्षयतृतीया आहे. ग्रामीण भागात या सणाला आखाजी असे म्हटले जाते. परंतु, या सणावर यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून पाणीटंचाईनेही नागरिक हैराण झाले आहेत.गावोगावी आखाजीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने या सणाच्या आनंदावर विरजन फिरवले आहे. पूर्वी महिला आणि मुलींची गौराईची गाणी जवळपास महिनाभर अगोदर पासून झोक्यावर बसून गायली जायची. या गाण्याच्या चाली सर्वत्र ऐकू येऊ लागल्या की आखाजी सणाची चाहूल लागत असे. उन्हाळ्यात शेतीची सर्व कामे संपलेली असत. याशिवाय मुलांना सुट्टया असल्याने आजोळी किंवा आपल्याच गावी सणाची मजा लुटली जायची. पाणी भरपूर असे त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवायची नाही. मात्र, आता सण साजरा करण्याच्या परंपरेच फरक पडत चाललेला दिसून येत आहे. बागाईती शेतीमुळे कामे वाढली असून मुलांचे देखील सुट्टयांमध्ये वेगवेगळे शिकवणी वर्ग आता सुरू झाले आहेत. गौराईची गाणी म्हणणारा महिला वर्ग कमी कमी होत चालला आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने तर पूर्ण चित्रच बदलले आहे. शहरातील नोकरी व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेला पुरूष वर्ग देखील आता गावाकडे येणे टाळतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने साजरा होणाऱ्या आखाजी सणाची गोडी आता काहीशी कमी होत चालली आहे. त्यातच यंदा दुष्काळाची धग प्रचंड असल्याने शिवाय महागाईही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचे सावट या सणावर दिसून येत आहे.आमराई नामशेषनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच शेतीपिकांना बसत आला आहे. यंदा निसर्गाच्या याच लहरीपणामुळे आमराईवर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादनावरही परिणाम झाला असून त्याचा फटका आखाजीला बसला आहे. घरोघरी गौराईची स्थापना देखील कमी होऊ लागली आहे. एकेकाळी कसमादे परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा हा सण आता केवळ औपचारिकता ठरत चालला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक