शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:07 IST

सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे.

ठळक मुद्देपाऊस मुबलक बरसेना : बाजारपेठेतील उलाढाल असमाधानकारक, उत्साह कमी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे. बैलांचा साज घ्यायलाही पैसा नसल्याने सणाच्या तोंडावरही बाजारात समाधानकारक उलाढाल झालेली नाही.बळीराजाचा खरा मित्र अशी ओळख म्हणून सण पोळा हा साजरा केला जातो. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात बैलांच्या पोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सततची नापिकी व पावसाची पाठ या दोन बाबींमुळे पोळा सणावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसुन येत आहे. याउपरही जीएसटीमुळे बैलांचा साज घेणाºया साहित्यांमध्ये वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत आहे. सण साजरा करायचाच पण पैशाविना कसा असा प्रश्न तो स्वत:लाच विचारित आहे.जिल्ह्यात बºयाच ठिकाणी मोठा पोळा भरविला जातो. मात्र पुर्वीपेक्षा बैल जोड्यांची संख्या कमी झाल्याने पोळा भरणाºया ठिकाणी मनोरंजनात्मक साहित्य जास्त व बैल जोड्यांची संख्या कमी असे दृष्य दिसून येत आहे.बैलांचा साज महागलामागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत उलाढाल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बैलांचा साज घेण्यात येणाºया साहित्यांमध्ये येसण ५० रुपये जोडी, चौरंग ४० रुपये जोडी, बैलांचा ढुल १३५० ते २००० रुपये जोडी, मटाटी ४० रुपये जोडी, माला १०० रुपये जोडी, पेंट ३० रुपये (५० ग्रॅम), रंग-बेगड १० रुपये, गोप ५ रुपये, कासरा १०० रुपये जोडी, मोरखी १०० रुपये जोडी या भावाने साहित्य मिळत आहेत. हेच साहित्य मागील वर्षी कमी दरात उपलब्ध होते. अपेक्षेनुरुप पाऊस न बरसल्याने शेतात पेरलेले धान्यही उगवले नाही. कुठे उगवले तर रोवणीसाठी पाणी नाही. अशा दुविधा स्थितीत सापडलेल्या बळीराजासमोर आर्थिक चणचण असतांना पोळा सण साजरा तरी कसा करावा असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतही समाधानकारक उलाढाल होत नसल्याची प्रतिक्रिया बैलांचा साज विकणारे शब्बीर खान यांनी दिली. पोळा सण असतानाही या व्यवसायात घट दिसून आल्याचीही म्हणण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीदारांची संख्या कमी आहे. दुसरीकडे बैलजोड्यांची संख्याही घटत असल्याने ही समस्या वाढली आहे. पैशाअभावी बैलांच्या सजावटीकरिता लागणाºया खरेदीबाबतही शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी राजकारण बाजूला सोडून सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची व शासन दरबारी व्यथा मांडण्याची शक्यता आहे. अधिकाºयानीही उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार न करता नियोजन व प्रत्यक्ष चौकशीचे निर्देश देण्याची आवश्यकता आहे. करीडी परिसरात मंगळवारला काही कालावधीसाठी दमदार पाऊस झाला असला तरी पावसाचे पाणी शेतीला पडलेल्या भेगांमध्ये जिरले आहे.उमेश तुमसरे शेतकरी पालोरा