शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.

ठळक मुद्देजनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.अजून एक महिनाभर पुरेल एवढाच चारा उपलब्ध असून, पुढचे ५ ते ७ महिने काढायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांचे मनेगाव येथील पाहुणे तानाजी शिंदे यांना ट्रॅक्टरद्वारे १ ट्रॉली मक्याच्या चाºयाची कुट्टी नेण्यासाठी सुमारे ७० किलोमीटर अंतर जाण्यासाठी तयारी करीत आहेत. या १ ट्रॉली चाºयाची सध्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. गत महिन्यात मोठ्या प्रमाणात चाºयाची विक्र ी चढ्या दराने करण्यात आली होती.दुसºया जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शेतकºयांनी येवला तालुक्यातील पश्चिम भागातून चारा वाहतूक केली आहे. आता नवीन चारा करायचा म्हटल्यावर पाण्याचा प्रश्न पुन्हा शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. कारण मे महिन्यापासून केवळ कडक उन्हाची तीव्रता सोसत असलेल्या मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, मुखेड, मुखेड फाटा आदी भागात विहीर, बोअरवेल यांनी केव्हाच तळ गाठला असल्याने नवीन चाºयाच्या पिकाला पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येवला तालुक्यातील ५ मंडळात शासनाने दुष्काळी परिस्थिती असल्याची घोषणा १ महिनाभरापूर्वीच केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दुष्काळी उपाययोजना केल्या नाही. शासनाने केवळ दुष्काळाची घोषणा न करता दुष्काळ निवारण करण्याची तसेच मागणी शेतकºयांकडून होत आहे.दुष्काळग्रस्त भागात शासनाने प्रामुख्याने जनावरांच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. चारा छावण्या तत्काळ सुरू न केल्यास महागडी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी