शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.

ठळक मुद्देजनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.अजून एक महिनाभर पुरेल एवढाच चारा उपलब्ध असून, पुढचे ५ ते ७ महिने काढायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांचे मनेगाव येथील पाहुणे तानाजी शिंदे यांना ट्रॅक्टरद्वारे १ ट्रॉली मक्याच्या चाºयाची कुट्टी नेण्यासाठी सुमारे ७० किलोमीटर अंतर जाण्यासाठी तयारी करीत आहेत. या १ ट्रॉली चाºयाची सध्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. गत महिन्यात मोठ्या प्रमाणात चाºयाची विक्र ी चढ्या दराने करण्यात आली होती.दुसºया जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शेतकºयांनी येवला तालुक्यातील पश्चिम भागातून चारा वाहतूक केली आहे. आता नवीन चारा करायचा म्हटल्यावर पाण्याचा प्रश्न पुन्हा शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. कारण मे महिन्यापासून केवळ कडक उन्हाची तीव्रता सोसत असलेल्या मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, मुखेड, मुखेड फाटा आदी भागात विहीर, बोअरवेल यांनी केव्हाच तळ गाठला असल्याने नवीन चाºयाच्या पिकाला पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येवला तालुक्यातील ५ मंडळात शासनाने दुष्काळी परिस्थिती असल्याची घोषणा १ महिनाभरापूर्वीच केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दुष्काळी उपाययोजना केल्या नाही. शासनाने केवळ दुष्काळाची घोषणा न करता दुष्काळ निवारण करण्याची तसेच मागणी शेतकºयांकडून होत आहे.दुष्काळग्रस्त भागात शासनाने प्रामुख्याने जनावरांच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. चारा छावण्या तत्काळ सुरू न केल्यास महागडी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी