शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कांदा भावातील घसरणीमुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: May 4, 2016 22:29 IST

दुष्काळात तेरावा : रब्बीतील हवामानाचा फटका; उत्पादन खर्चही फिटत नसल्याने हतबलता

दत्ता दिघोळे  नायगावकधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातून चांगलेच पाणी काढले आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने व उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सततच्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या कष्टकरी शेतकरीवर्गाला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाऱ्या हवामानाशी दोन हात करूनही बाजारात मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे पुरता जेरीस आलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षी खरीप हंगामात खराब हवामानामुळे वाया गेला होता, तर रब्बीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.बाजारात रब्बीच्या कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केलेल्या खर्चाचीही वसुली होत नसल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सतत बदलणारे हवामान, खते, औषधांच्या वाढलेल्या किमती व दिवसेंदिवस वाढणारी मजुरी आदिंचा सामना करत पिकवलेला कांदा बाजारात ४५० ते ५५० रुपये दराने विकला जात असल्याने हातात पडणाऱ्या या रकमेत उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी केलेल्या खर्चाची वसुलीही होत नाही तेथे कर्जाची फेड कशी करायची या मानसिक वेदनेने त्रस्त झाला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेकडे राजकीय नेते व मीडियाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. ग्राहकांना वाढलेल्या भावाची मिरची लागली की सुरू होणारी नेतेगिरी व वारंवार दाखवल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे गौडबंगाल शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. यंदाचा सर्वच हंगाम वाया गेल्यानंतर मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी कोणालाच का दिसत नाही व ते पुसण्यासाठीही कोणीच का पुढे येत नाही, असा आर्त सवाल विचारला जात आहे.