शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भावातील घसरणीमुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: May 4, 2016 22:29 IST

दुष्काळात तेरावा : रब्बीतील हवामानाचा फटका; उत्पादन खर्चही फिटत नसल्याने हतबलता

दत्ता दिघोळे  नायगावकधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातून चांगलेच पाणी काढले आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने व उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सततच्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या कष्टकरी शेतकरीवर्गाला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाऱ्या हवामानाशी दोन हात करूनही बाजारात मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे पुरता जेरीस आलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षी खरीप हंगामात खराब हवामानामुळे वाया गेला होता, तर रब्बीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.बाजारात रब्बीच्या कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केलेल्या खर्चाचीही वसुली होत नसल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सतत बदलणारे हवामान, खते, औषधांच्या वाढलेल्या किमती व दिवसेंदिवस वाढणारी मजुरी आदिंचा सामना करत पिकवलेला कांदा बाजारात ४५० ते ५५० रुपये दराने विकला जात असल्याने हातात पडणाऱ्या या रकमेत उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी केलेल्या खर्चाची वसुलीही होत नाही तेथे कर्जाची फेड कशी करायची या मानसिक वेदनेने त्रस्त झाला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेकडे राजकीय नेते व मीडियाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. ग्राहकांना वाढलेल्या भावाची मिरची लागली की सुरू होणारी नेतेगिरी व वारंवार दाखवल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे गौडबंगाल शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. यंदाचा सर्वच हंगाम वाया गेल्यानंतर मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी कोणालाच का दिसत नाही व ते पुसण्यासाठीही कोणीच का पुढे येत नाही, असा आर्त सवाल विचारला जात आहे.