शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

युवकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 23:49 IST

घोटीजवळील घटना : तुटलेल्या रेल्वेरुळाची दिली माहिती

घोटी : परिसरातील मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील रुळाचा मोठा तुकडा तुटल्याचे लक्षात आल्याने एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत रेल्वेचा संभाव्य अपघात टाळला आहे. येथील विजय जाधव या तरुणाने प्रसंगावधान दाखवत तुटलेल्या रुळाची माहिती स्टेशन मास्तरांना देत स्वत:चा जीव धोक्यात घालून या रुळावरून येणारी दादर-वाराणसी गाडी थांबवून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मुंबई-भुसावळ रेल्वेरुळाचा काही भाग तुटल्याचे बुधवारी सकाळी ७. ३५ वाजता घोटी येथील विजय जाधव या तरुणाच्या लक्षात आले. यावेळी जाधव यांना काय करावे ते सुचेना. रेल्वे स्थानक अथवा रेल्वे प्रशासनाचा यापैकी कोणाचाही संपर्क त्यांच्याकडे नव्हता. याचवेळी त्यांना आपला मित्र मिथुन बिडवे हा रेल्वे स्टेशनजवळ रहात असल्याचे आठवले. त्यानी क्षणाचाही विलंब न करता बिडवेला फोन करून पोल क्र मांक सांगून तेथे रेल्वे रूळ तुटला असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्तरला कळविण्यास सांगितले. त्यानुसार बिडवे यांचा पुतण्या शुभम बिडवे याने रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन मास्तरला घटनेची माहीती दिली.त्यानंतर स्टेशन मास्तरने तत्काळ ही माहिती इगतपुरी पर्यंतच्या सर्व रेल्वे केबिन्सला कळविली. मात्र या तोपर्यंत बराच वेळ गेल्याने इगतपुरीहुन नाशिककडे जाणारी वाराणसी एक्सप्रेस सुसाट वेगाने त्याच रु ळावरु न धावत असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचा अपघात रोखायचा असा निश्चय करून ते समोरून येत असलेल्या ट्रेनच्या दिशेकडे धावू लागले. त्यांनी हातवारे करून रेल्वे चालकाला पुढे धोका असल्याचे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी हातवारे करून रेल्वे रूळ तुटले असल्याचे चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाच्या हा प्रकार आला आणि त्याने गाडीचा वेग कमी केला. रुळ तुटल्याचे लक्षात आल्याने तुटलेल्या रुळापासून काही अंतरावरच गाडी थांबविण्यात चालकाला यश आले. त्यामुळे एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला असून अनेक प्रवाशांचे प्राणही वाचले आहे.दरम्यान, रेल्व प्रशासनाने विजय जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानाची दखल घेवून त्यांचा व त्यांना मदत करणाऱ्या युवकाचा भुसावळ येथे सत्कार समारंभ अयोजित केला आहे. (वार्ताहर) घोटीतील विजय जाधव गेल्या पंधरा दिवसापासून रेल्वे रु ळच्या कडेने दारणा नदी पात्रापर्यंत फिरण्यास जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी सहा वाजताच ते फिरण्यास निघाले होते. काही अंतर पार केल्यानंतर मुंबईहुन नाशिककडे जाणारी एक गाडी सुसाट वेगाने निघून गेली. ही गाडी पार झाल्यानंतर गाडीच्या हादऱ्याने रेल्वेरु ळाचा भला मोठा तुकडा तुटला असल्याची त्यांच्या लक्षात आली.थंडीच्या दिवसात रेल्वे रूळ अंकुचन पावत असल्याने रेल्वे रु ळाला तडे पडत असल्याने अपघात होतात. दोन वर्षांपूर्वी या घटनास्थळाजवळच मंगला एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला होता. यात रेल्वे प्रशासनाची मोठी हानी झाली होती. मात्र तसाच प्रकार आजही घडल्याने केवळ युवकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला आहे.