शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

युवकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 23:49 IST

घोटीजवळील घटना : तुटलेल्या रेल्वेरुळाची दिली माहिती

घोटी : परिसरातील मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील रुळाचा मोठा तुकडा तुटल्याचे लक्षात आल्याने एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत रेल्वेचा संभाव्य अपघात टाळला आहे. येथील विजय जाधव या तरुणाने प्रसंगावधान दाखवत तुटलेल्या रुळाची माहिती स्टेशन मास्तरांना देत स्वत:चा जीव धोक्यात घालून या रुळावरून येणारी दादर-वाराणसी गाडी थांबवून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मुंबई-भुसावळ रेल्वेरुळाचा काही भाग तुटल्याचे बुधवारी सकाळी ७. ३५ वाजता घोटी येथील विजय जाधव या तरुणाच्या लक्षात आले. यावेळी जाधव यांना काय करावे ते सुचेना. रेल्वे स्थानक अथवा रेल्वे प्रशासनाचा यापैकी कोणाचाही संपर्क त्यांच्याकडे नव्हता. याचवेळी त्यांना आपला मित्र मिथुन बिडवे हा रेल्वे स्टेशनजवळ रहात असल्याचे आठवले. त्यानी क्षणाचाही विलंब न करता बिडवेला फोन करून पोल क्र मांक सांगून तेथे रेल्वे रूळ तुटला असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्तरला कळविण्यास सांगितले. त्यानुसार बिडवे यांचा पुतण्या शुभम बिडवे याने रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन मास्तरला घटनेची माहीती दिली.त्यानंतर स्टेशन मास्तरने तत्काळ ही माहिती इगतपुरी पर्यंतच्या सर्व रेल्वे केबिन्सला कळविली. मात्र या तोपर्यंत बराच वेळ गेल्याने इगतपुरीहुन नाशिककडे जाणारी वाराणसी एक्सप्रेस सुसाट वेगाने त्याच रु ळावरु न धावत असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचा अपघात रोखायचा असा निश्चय करून ते समोरून येत असलेल्या ट्रेनच्या दिशेकडे धावू लागले. त्यांनी हातवारे करून रेल्वे चालकाला पुढे धोका असल्याचे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी हातवारे करून रेल्वे रूळ तुटले असल्याचे चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाच्या हा प्रकार आला आणि त्याने गाडीचा वेग कमी केला. रुळ तुटल्याचे लक्षात आल्याने तुटलेल्या रुळापासून काही अंतरावरच गाडी थांबविण्यात चालकाला यश आले. त्यामुळे एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला असून अनेक प्रवाशांचे प्राणही वाचले आहे.दरम्यान, रेल्व प्रशासनाने विजय जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानाची दखल घेवून त्यांचा व त्यांना मदत करणाऱ्या युवकाचा भुसावळ येथे सत्कार समारंभ अयोजित केला आहे. (वार्ताहर) घोटीतील विजय जाधव गेल्या पंधरा दिवसापासून रेल्वे रु ळच्या कडेने दारणा नदी पात्रापर्यंत फिरण्यास जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी सहा वाजताच ते फिरण्यास निघाले होते. काही अंतर पार केल्यानंतर मुंबईहुन नाशिककडे जाणारी एक गाडी सुसाट वेगाने निघून गेली. ही गाडी पार झाल्यानंतर गाडीच्या हादऱ्याने रेल्वेरु ळाचा भला मोठा तुकडा तुटला असल्याची त्यांच्या लक्षात आली.थंडीच्या दिवसात रेल्वे रूळ अंकुचन पावत असल्याने रेल्वे रु ळाला तडे पडत असल्याने अपघात होतात. दोन वर्षांपूर्वी या घटनास्थळाजवळच मंगला एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला होता. यात रेल्वे प्रशासनाची मोठी हानी झाली होती. मात्र तसाच प्रकार आजही घडल्याने केवळ युवकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला आहे.