शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 6:53 PM

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : भाजीपाला व्यवसायिक-वाहनधारकांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.शिर्डी सुरत राज्य महामार्गाच्या व राष्ट्रीय महार्गाच्या वणी चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गाडी उभी करण्यावरून वाद सुरू झाले त्यामुळे तेथील एका वाहनधारकांने थेट आपली पिकप गाडी राज्यमहार्गावर आडवी लावली, त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी गाडी काढण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यावर त्यांनाच धक्काबुक्की करत वाद घातले. त्यामुळे येथील वाहनधारकाची गुंडागिरी चव्हाट्यावर आली असून प्रशासनाने त्यांना आवर घालावा अन्यथा शहरात हे वाहनधारक छोट्या छोट्या वादातून मोठे प्रकरण घडू शकते, अशी चर्चा पिरसरातील नागरीक व वाहनधारक करीत आहेत.नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग गेल्याने शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो व कांद्याची मोठी मंडी असल्याने परराज्यातून हजारो व्यापारी, कामगार आणि वाहनांनामुळे शहर चोवीस तास गजबलेले असते. मात्र चौकाचौकात सुरु झालेल्या भाजीपाला विक्रीमुळे वाहनांची कोंडी होऊन शहरात चक्का जाम होत आहे. तरीही प्रशासन गप्प आहे, परिणामी वाहन धारकांनामध्ये वाद होऊन शहरात गोंधळ निर्माण होत आहे .त्याकरीता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा व चौका चौकातील अनधिकृत गर्दी कमी करावी अशी विनंती करण्यात आली.आठवडे बाजार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात दररोज सुरू केलेला चौकाचौकातील भाजीपाला व्यवसाय बंद करावा म्हणजे शहरात होणारा गोंधळ तरी कमी होईल .- गणेश तिडके, पिंपळगाव बसवंत.वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणारवणी चौफुलीवर अनधिकृत टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असून याबत वरिष्ठस्थरावर पाठपुरावा केला जात आहे. लवकरच उड्डाणपुलाखालील अनधिकृत व्यावसायिकांना चाप बसेल.- नवनाथ केदारे, टोल नाका व्यवस्थापक.वणी चौफुलीवरील गोंधळ थांबवापिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी तसेच उड्डाणपुलाखाली टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन सात्यताने अपघात घडत असल्याने या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे.त्यामुळे येथील गोंधळ थांबवा- राजाभाऊ सोनवणे, अध्यक्ष, शिववाहतुक सेना.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgram panchayatग्राम पंचायत