शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:54 IST

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : भाजीपाला व्यवसायिक-वाहनधारकांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.शिर्डी सुरत राज्य महामार्गाच्या व राष्ट्रीय महार्गाच्या वणी चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गाडी उभी करण्यावरून वाद सुरू झाले त्यामुळे तेथील एका वाहनधारकांने थेट आपली पिकप गाडी राज्यमहार्गावर आडवी लावली, त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी गाडी काढण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यावर त्यांनाच धक्काबुक्की करत वाद घातले. त्यामुळे येथील वाहनधारकाची गुंडागिरी चव्हाट्यावर आली असून प्रशासनाने त्यांना आवर घालावा अन्यथा शहरात हे वाहनधारक छोट्या छोट्या वादातून मोठे प्रकरण घडू शकते, अशी चर्चा पिरसरातील नागरीक व वाहनधारक करीत आहेत.नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग गेल्याने शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो व कांद्याची मोठी मंडी असल्याने परराज्यातून हजारो व्यापारी, कामगार आणि वाहनांनामुळे शहर चोवीस तास गजबलेले असते. मात्र चौकाचौकात सुरु झालेल्या भाजीपाला विक्रीमुळे वाहनांची कोंडी होऊन शहरात चक्का जाम होत आहे. तरीही प्रशासन गप्प आहे, परिणामी वाहन धारकांनामध्ये वाद होऊन शहरात गोंधळ निर्माण होत आहे .त्याकरीता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा व चौका चौकातील अनधिकृत गर्दी कमी करावी अशी विनंती करण्यात आली.आठवडे बाजार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात दररोज सुरू केलेला चौकाचौकातील भाजीपाला व्यवसाय बंद करावा म्हणजे शहरात होणारा गोंधळ तरी कमी होईल .- गणेश तिडके, पिंपळगाव बसवंत.वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणारवणी चौफुलीवर अनधिकृत टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असून याबत वरिष्ठस्थरावर पाठपुरावा केला जात आहे. लवकरच उड्डाणपुलाखालील अनधिकृत व्यावसायिकांना चाप बसेल.- नवनाथ केदारे, टोल नाका व्यवस्थापक.वणी चौफुलीवरील गोंधळ थांबवापिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी तसेच उड्डाणपुलाखाली टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन सात्यताने अपघात घडत असल्याने या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे.त्यामुळे येथील गोंधळ थांबवा- राजाभाऊ सोनवणे, अध्यक्ष, शिववाहतुक सेना.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgram panchayatग्राम पंचायत