शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

घटलेल्या टक्केवारीने निवडणूकेच्छूकांना धास्ती

By श्याम बागुल | Updated: December 26, 2018 15:41 IST

नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक

नाशिक : निवडणूक सहकार क्षेत्रातील बॅँकेची असली तरी, या निवडणुकीसाठी खेळले गेलेले डावपेच व केली गेलेली व्युव्हरचना लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मैदानापेक्षा काही वेगळे नव्हती. संपुर्ण जिल्हा व त्याबाहेर मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असतानाही ज्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी घटली ते पाहता विशेष करून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघावर डोळा ठेवून असलेल्या निवडणूक इच्छुकांनी धास्ती खाल्ली आहे. कारण मध्य मतदार संघावर प्रभुत्व ठेवून असलेला बहुतांशी मतदार या बॅँकेचा सभासद आहे.नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सुरूवातीच्या काळात बिनवरोध निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली व त्यासाठी गुप्त बैठका, चर्चेचे खल झाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीवर मध्य मतदार संघावर डोळा ठेवून असलेले माजी आमदार वसंत गिते व नगरसेवक गजानन शेलार यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे निवडणूक बिनविरोध होण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले. आपल्या राजकीय भवितव्यासाठी गिते यांना बॅँकेच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व नव्याने निर्माण करायचे तर शेलार यांनाही गेल्या काही वर्षातील राजकीय विजनवास दूर करण्यासाठी मोठी लढाई लढायची असल्याने त्यांनाही मर्चन्ट बॅँकेचे मैदान आयतेच मिळाले. परिणामी विधानसा निवडणुकीत परस्पर विरोधात लढण्याची तयारी ठेवणारे बॅँकेची निवडणूक एकत्र कशी लढवतील ? त्यातूनच बॅँकेत एक नव्हे तब्बल तीन पॅनल रिंगणात उतरले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तिन्ही पॅनलने जंग जंग पछाडले, समाजनिहाय बैठका, राजकीय भेटीगाठी, व्यापारी, व्यावसायिकांची मनधरणी करण्याचे सारे प्रयत्न करण्यात आले, गावोगावी सभा घेवून सभासद मतदारांना मतदानासाठी आग्रह करण्यात आला. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांची उदासिनताच दिसून आली. आर्थिक बाबीशी निगडीत असलेल्या विषयात बॅँकेच्या सभासदांनी दाखविलेली अनुत्सूकता पाहता, आणखी चार, सहा महिन्यांनी येवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत सामान्य मतदारांची काय मानसिकता असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कधी कधी परिवर्तनाला हातभारही लावते, तर कधी प्राप्त परिस्थिती कायम ठेवत असल्याचे निवडणूक इच्छूक चांगलेच जाणून आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक