शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

घटलेल्या टक्केवारीने निवडणूकेच्छूकांना धास्ती

By श्याम बागुल | Updated: December 26, 2018 15:41 IST

नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक

नाशिक : निवडणूक सहकार क्षेत्रातील बॅँकेची असली तरी, या निवडणुकीसाठी खेळले गेलेले डावपेच व केली गेलेली व्युव्हरचना लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मैदानापेक्षा काही वेगळे नव्हती. संपुर्ण जिल्हा व त्याबाहेर मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असतानाही ज्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी घटली ते पाहता विशेष करून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघावर डोळा ठेवून असलेल्या निवडणूक इच्छुकांनी धास्ती खाल्ली आहे. कारण मध्य मतदार संघावर प्रभुत्व ठेवून असलेला बहुतांशी मतदार या बॅँकेचा सभासद आहे.नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सुरूवातीच्या काळात बिनवरोध निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली व त्यासाठी गुप्त बैठका, चर्चेचे खल झाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीवर मध्य मतदार संघावर डोळा ठेवून असलेले माजी आमदार वसंत गिते व नगरसेवक गजानन शेलार यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे निवडणूक बिनविरोध होण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले. आपल्या राजकीय भवितव्यासाठी गिते यांना बॅँकेच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व नव्याने निर्माण करायचे तर शेलार यांनाही गेल्या काही वर्षातील राजकीय विजनवास दूर करण्यासाठी मोठी लढाई लढायची असल्याने त्यांनाही मर्चन्ट बॅँकेचे मैदान आयतेच मिळाले. परिणामी विधानसा निवडणुकीत परस्पर विरोधात लढण्याची तयारी ठेवणारे बॅँकेची निवडणूक एकत्र कशी लढवतील ? त्यातूनच बॅँकेत एक नव्हे तब्बल तीन पॅनल रिंगणात उतरले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तिन्ही पॅनलने जंग जंग पछाडले, समाजनिहाय बैठका, राजकीय भेटीगाठी, व्यापारी, व्यावसायिकांची मनधरणी करण्याचे सारे प्रयत्न करण्यात आले, गावोगावी सभा घेवून सभासद मतदारांना मतदानासाठी आग्रह करण्यात आला. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांची उदासिनताच दिसून आली. आर्थिक बाबीशी निगडीत असलेल्या विषयात बॅँकेच्या सभासदांनी दाखविलेली अनुत्सूकता पाहता, आणखी चार, सहा महिन्यांनी येवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत सामान्य मतदारांची काय मानसिकता असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कधी कधी परिवर्तनाला हातभारही लावते, तर कधी प्राप्त परिस्थिती कायम ठेवत असल्याचे निवडणूक इच्छूक चांगलेच जाणून आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक