शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिसंख्येत घट : शिक्षक होण्याकडे ओढा होतोय कमी नांदगावचे अध्यापक विद्यालय स्थलांतराच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:19 IST

नांदगाव : ६८ वर्षे जुने असलेले शासकीय अनुदान प्राप्त अध्यापक विद्यालय (डी.एड.) नजीकच्या काळात दिंडोरी किंवा नाशिक येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देडी.एड.ची मागणी काही प्रमाणात कमी माफक दरात शासकीय होस्टेल उपलब्ध

नांदगाव : ६८ वर्षे जुने असलेले शासकीय अनुदान प्राप्त अध्यापक विद्यालय (डी.एड.) नजीकच्या काळात दिंडोरी किंवा नाशिक येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकेकाळी येथील अध्यापक विद्यालय नावाजलेले होते. अलीकडच्या काळात शिक्षणक्षेत्रातील नोकºयांना ओहोटी लागल्याने डी.एड.ची मागणी काही प्रमाणात कमी झाली. अनेक वर्षे शिक्षणसेवकाच्या तुटपुंज्या मानधनावर काम करूनही अद्याप कायमस्वरूपी न झाल्याने डी.एड. व बी.एड.कडचा ओढा कमी झाला आहे.नांदगाव अध्यापक विद्यालयाला ६० विद्यार्थी घेण्याची मान्यता आहे. मात्र २०१५ मध्ये १५, २०१६ मध्ये ५९ व २०१७ मध्ये फक्त ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१५मधील कमी प्रवेशसंख्येमुळे संबंधित संस्थेने तातडीने ठराव करून अध्यापक विद्यालय नांदगाव येथून हलविण्याचा निर्णय त्याच वर्षी घेतला. त्याची परवानगी भोपाळस्थित एनसीटीईकडे (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन) प्रलंबित असून, ती अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मविप्रचे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी दिली. दिंडोरी येथे मविप्रचे विनाअनुदानित तत्त्वावर अध्यापक विद्यालय सुरू आहे. त्याठिकाणी माफक दरात शासकीय होस्टेल उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च कमी होतो, असेही कारण नियोजित स्थलांतरामागे दिले जाते. नाशिकचे डी.एड. अनुदानित असल्याने तिथला फीचा खर्च कमी आहे. मात्र दोन्ही ठिकाणचे फायदे व तोटे वेगवेगळे आहेत. त्याचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. स्थलांतर थांबविण्याची मागणी विद्यार्थी कमी आहेत हे काही अंशी सत्य असले तरी नजीकच्या काळात शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासनाचे धोरण बदलले व नव्या संधी निर्माण झाल्या तर पुन: येथील अध्यापक विद्यालयाचा सुवर्णकाळ येऊ शकतो. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडत आहेत तर फार्मसीला चांगले दिवस आले आहेत. म्हणूनच जुन्या व नांदगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या विद्यालयाचे स्थलांतर संस्थेने आवश्यक उपाययोजना करून थांबवावे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरांमधून पुढे येत आहे.