शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टँकर सुरू झाल्याने पाण्यासाठीची पुरणगावच्या महिलांची भटकंती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:46 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

ठळक मुद्देमहिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

गावातील विहीरी तळगाठला असून रानोमाळ हि साठवुन ठेवलÞेल्या पाण्यावर व प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतकेच पाणी कुटुंबाकडे असल्याने ग्रामस्थांची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर अवलंबून होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच २८ मार्च रोजी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, प्रांत कार्यालय, पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला होता. गुरुवारी (दि.४) गावात टॅकर येताच महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.१५ वर्षांपूर्वी अनेक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबविल्या गेल्या, पण पाण्याअभावी या योजना बंद पडल्या, तर काही ठिकाणी धुळखात अपुर्ण अवस्थेत बंद पडल्या, पर्यायाने तेव्हा सुरू असलेल्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतुन हि गावे वगळली गेली. पाऊस, पाणी, नदी नाले वाहिल्यास ठराविक कालावधीसाठी या ग्रामस्थांना पाणी मिळते पण? उन्हाळ्यात मात्र या गावांना आरक्षित पाण्याचा किंवा शासनाच्या टॅँकर अवलंबून रहावे लागते. पुरणगाव ग्रामपंचायतीने पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन येथील बंधारा भरण्यासाठी ठराव दिला होता पण तो नामंजूर करण्यात आल्याने गावाची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर आवलंबून होती.पुरणगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, असुन या पाणी टंचाईकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही, गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे सतत पाठ पुरावा करु न अखेर पुरणगावासाठी गुरुवारपासुन शासनाच्या टॅकरने पाणी पुरवठा चालु झाला. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.