शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

टँकर सुरू झाल्याने पाण्यासाठीची पुरणगावच्या महिलांची भटकंती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:46 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

ठळक मुद्देमहिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

गावातील विहीरी तळगाठला असून रानोमाळ हि साठवुन ठेवलÞेल्या पाण्यावर व प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतकेच पाणी कुटुंबाकडे असल्याने ग्रामस्थांची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर अवलंबून होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच २८ मार्च रोजी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, प्रांत कार्यालय, पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला होता. गुरुवारी (दि.४) गावात टॅकर येताच महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.१५ वर्षांपूर्वी अनेक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबविल्या गेल्या, पण पाण्याअभावी या योजना बंद पडल्या, तर काही ठिकाणी धुळखात अपुर्ण अवस्थेत बंद पडल्या, पर्यायाने तेव्हा सुरू असलेल्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतुन हि गावे वगळली गेली. पाऊस, पाणी, नदी नाले वाहिल्यास ठराविक कालावधीसाठी या ग्रामस्थांना पाणी मिळते पण? उन्हाळ्यात मात्र या गावांना आरक्षित पाण्याचा किंवा शासनाच्या टॅँकर अवलंबून रहावे लागते. पुरणगाव ग्रामपंचायतीने पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन येथील बंधारा भरण्यासाठी ठराव दिला होता पण तो नामंजूर करण्यात आल्याने गावाची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर आवलंबून होती.पुरणगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, असुन या पाणी टंचाईकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही, गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे सतत पाठ पुरावा करु न अखेर पुरणगावासाठी गुरुवारपासुन शासनाच्या टॅकरने पाणी पुरवठा चालु झाला. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.