शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दरी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:22 IST

नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मातोरी : नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या संदर्भात वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक शेतकºयांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांनी पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून त्यांच्याकडे तक्रार करा, असा सल्ला देऊन हात वर केले आहेत. तर बांधकाम खात्याकडे तक्रार केली असता त्यांनी पाटबंधारे खात्याकडे बोट दाखविले आहे. या दोन्ही खात्यांच्या टोलवाटोलवीमुळे या रस्त्याची व त्यावरील पुलाची मालकी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील गावांना जोडणाºया या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, पुलावरून वाहन गेल्यास त्याचा स्लॅब पडू लागला आहे.मोठ्या वाहनामुळे तर पुलाला मोठ्या प्रमाणात हादरे बसून पूल कोसळतो की काय असे वाटू  लागते.  त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर पुलाचे आॅडिट करून त्याचे बळकटीकरण करावे किंवा सदरचा पूल जमीनदोस्त करून नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात असून, तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद