शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 17:45 IST

खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.

ठळक मुद्देया ढगाळ वातावरणा तयार होऊन जर पाऊस आला तर हा कांदा शेतात सडेल कि काय याची भीती

खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.चालू वर्षी सुरवातीपासून वातावरण चांगले असल्याने गहू, हरभरा, कांदे आदी पिके मोठी जोमात होती.वातावरण चांगले असल्याने या वर्षी शेतकर्याला पिकावर कोणत्याही प्रकारची औषधाची फवारणी करण्याची वेळ आली नव्हती. असेच या वर्षी गेल्या दीड महिन्यापासून थंडी चांगल्या प्रमाणात असल्याने ती पिकांसासाठी पोषक होती. या थंडीमुळे पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत नव्हती. काही शेकºयांनी तर पंधरा-पंधरा दिवस पिकांना पाणी दिले नव्हते, तरीही पिके जोमात आहेत.परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झशला असून थंडी अचानक गायब झाली आहे. आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात ऊष्णता जाणवू लागली आहे. उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. त्याची पूर्णपणे वाढ होऊन आता त्याचा कांदा गळतीला सुरवात होणार आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता आहे. कांद्याचा गळतीवर परिणाम होऊन कांद्याच्या उत्पादन घट होईल की काय? याची भीती शेतकºयांना वाटत आहे. तसेच गहू व हरभºयाचे पिकेही जोमात आहेत. गव्हाचे पीक आता आेंबी काढली असून आता त्याचे दाणे भरायला सुरवात झाली आहे. तेव्हा या ढगाळ वातावरणामुळे त्यावर ताबोºया रोगाचा प्रादुर्भाव होणाची शक्यता असते. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होते. तसेच हरभरा पिके आता फुले लागून घाटे लागली आहेत. या ढगाळ वातावरणामुळे या हरभरा पिकावर घाटआळई पडण्याची शक्यता असते. या आळीईमुळे हरभरे घाटे भरण्याचे आतच पोकळ पडतात त्यामुळे हरभºयाच्या उत्पादन घटण्याची शक्यता असते.या वर्षी विहिरींना पाणी कमी असल्याने काही शेतकºयांनी पुढे उन्हाळी कांद्यासाठी पाणी राहणार नाही. म्हणून रंगडा कांद्याची लागवड केली आहे. तो आता काढणीसाठी तयार झाला आहे. या ढगाळ वातावरणा तयार होऊन जर पाऊस आला तर हा कांदा शेतात सडेल कि काय याची भीती शेतकरी वर्गात तयार झाली.