शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 17:45 IST

खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.

ठळक मुद्देया ढगाळ वातावरणा तयार होऊन जर पाऊस आला तर हा कांदा शेतात सडेल कि काय याची भीती

खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.चालू वर्षी सुरवातीपासून वातावरण चांगले असल्याने गहू, हरभरा, कांदे आदी पिके मोठी जोमात होती.वातावरण चांगले असल्याने या वर्षी शेतकर्याला पिकावर कोणत्याही प्रकारची औषधाची फवारणी करण्याची वेळ आली नव्हती. असेच या वर्षी गेल्या दीड महिन्यापासून थंडी चांगल्या प्रमाणात असल्याने ती पिकांसासाठी पोषक होती. या थंडीमुळे पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत नव्हती. काही शेकºयांनी तर पंधरा-पंधरा दिवस पिकांना पाणी दिले नव्हते, तरीही पिके जोमात आहेत.परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झशला असून थंडी अचानक गायब झाली आहे. आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात ऊष्णता जाणवू लागली आहे. उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. त्याची पूर्णपणे वाढ होऊन आता त्याचा कांदा गळतीला सुरवात होणार आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता आहे. कांद्याचा गळतीवर परिणाम होऊन कांद्याच्या उत्पादन घट होईल की काय? याची भीती शेतकºयांना वाटत आहे. तसेच गहू व हरभºयाचे पिकेही जोमात आहेत. गव्हाचे पीक आता आेंबी काढली असून आता त्याचे दाणे भरायला सुरवात झाली आहे. तेव्हा या ढगाळ वातावरणामुळे त्यावर ताबोºया रोगाचा प्रादुर्भाव होणाची शक्यता असते. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होते. तसेच हरभरा पिके आता फुले लागून घाटे लागली आहेत. या ढगाळ वातावरणामुळे या हरभरा पिकावर घाटआळई पडण्याची शक्यता असते. या आळीईमुळे हरभरे घाटे भरण्याचे आतच पोकळ पडतात त्यामुळे हरभºयाच्या उत्पादन घटण्याची शक्यता असते.या वर्षी विहिरींना पाणी कमी असल्याने काही शेतकºयांनी पुढे उन्हाळी कांद्यासाठी पाणी राहणार नाही. म्हणून रंगडा कांद्याची लागवड केली आहे. तो आता काढणीसाठी तयार झाला आहे. या ढगाळ वातावरणा तयार होऊन जर पाऊस आला तर हा कांदा शेतात सडेल कि काय याची भीती शेतकरी वर्गात तयार झाली.