शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:01 IST

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : आवक घटली अन् मागणी वाढली

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणहून कर्ज व भांडवल उपलब्ध करून राहिलेली भाजीपाला पिके थोड्या फार प्रमाणात वाचवली. त्यामुळे बळीराजाच्या प्रयत्नांना यश आले. आता भाजीपाला पिकांना चांगला भाव वाढला आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे अतिशय महागडी औषधे फवारणी दिवसातून तीन वेळा करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.सध्या भाजीपाला पिकांचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांचा फायदा शेतकरी वर्गाला काहीच नाही. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त हे समीकरण गुंतागुंतीचे होऊन बसले आहे. या महागाईची झळ सर्वसामान्य शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.सध्या बळीराजा दोन वर्षांपासून कोरोना, परतीचा पाऊस, हवामानातील बदल या अस्मानी संकटांनी त्रस्त असताना आणि यंदा आपल्याला सुटका मिळेल ही आशा असताना परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक इ.मध्ये चिंतेचे वातावरण सध्या दिसत आहे. भाजीपाला आवक घटली असून ग्राहक वर्गातून मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे.भाजीपाल्याचे सध्याचे दर (किलो)टोमॅटो : ४० ते ५० रु.हिरवी मिरची : ८० ते ९० रु.गवार : १०० ते १२० रु.कोबी : २० ते ३० रु. (गड्डा)फ्लॉवर : २० ते ३० रु. (गड्डा)वांगी : ८० ते ८५ रु.शेवगा : ७० ते ७५ रु.मेथी : २० ते २५ रु. (जुडी)शेपू : २० रु. (जुडी)कांदापात : ३० रु. (जुडी)कोथिंबीर : १५ ते २० रु. (जुडी)बटाटे : २५ ते ३० रु.कारले : ११० ते ११५ रु.कांदा : ४५ रु.भेंडी : ७५ रु.सिमला मिरची : ८० रु.गिलके : ३५ रु.डांगर : २५ ते ३० रु. (नग)दोडके : ५५ रु.वाटाणा : ४५ रु.पालक : १५ रु.उसळ : २५ रु.लसूण : १७० रु.भोपळा, मुळा, वाल, डिंगरी, चवळी आदींचे भाव सोयीनुसार घेतले जातात.सध्या जरी भाजीपाला पिकाला भाव मिळत असला तरी ग्राहक वर्गापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. कारण भाजी बाजारपेठेमध्ये आवक अतिशय कमी होत असून, मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मिळत नसल्याने विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- बाळासाहेब सिरसाट, भाजीपाला विक्रेता.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार