शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

हवामान बदलल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:01 IST

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : आवक घटली अन् मागणी वाढली

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणहून कर्ज व भांडवल उपलब्ध करून राहिलेली भाजीपाला पिके थोड्या फार प्रमाणात वाचवली. त्यामुळे बळीराजाच्या प्रयत्नांना यश आले. आता भाजीपाला पिकांना चांगला भाव वाढला आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे अतिशय महागडी औषधे फवारणी दिवसातून तीन वेळा करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.सध्या भाजीपाला पिकांचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांचा फायदा शेतकरी वर्गाला काहीच नाही. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त हे समीकरण गुंतागुंतीचे होऊन बसले आहे. या महागाईची झळ सर्वसामान्य शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.सध्या बळीराजा दोन वर्षांपासून कोरोना, परतीचा पाऊस, हवामानातील बदल या अस्मानी संकटांनी त्रस्त असताना आणि यंदा आपल्याला सुटका मिळेल ही आशा असताना परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक इ.मध्ये चिंतेचे वातावरण सध्या दिसत आहे. भाजीपाला आवक घटली असून ग्राहक वर्गातून मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे.भाजीपाल्याचे सध्याचे दर (किलो)टोमॅटो : ४० ते ५० रु.हिरवी मिरची : ८० ते ९० रु.गवार : १०० ते १२० रु.कोबी : २० ते ३० रु. (गड्डा)फ्लॉवर : २० ते ३० रु. (गड्डा)वांगी : ८० ते ८५ रु.शेवगा : ७० ते ७५ रु.मेथी : २० ते २५ रु. (जुडी)शेपू : २० रु. (जुडी)कांदापात : ३० रु. (जुडी)कोथिंबीर : १५ ते २० रु. (जुडी)बटाटे : २५ ते ३० रु.कारले : ११० ते ११५ रु.कांदा : ४५ रु.भेंडी : ७५ रु.सिमला मिरची : ८० रु.गिलके : ३५ रु.डांगर : २५ ते ३० रु. (नग)दोडके : ५५ रु.वाटाणा : ४५ रु.पालक : १५ रु.उसळ : २५ रु.लसूण : १७० रु.भोपळा, मुळा, वाल, डिंगरी, चवळी आदींचे भाव सोयीनुसार घेतले जातात.सध्या जरी भाजीपाला पिकाला भाव मिळत असला तरी ग्राहक वर्गापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. कारण भाजी बाजारपेठेमध्ये आवक अतिशय कमी होत असून, मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मिळत नसल्याने विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- बाळासाहेब सिरसाट, भाजीपाला विक्रेता.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार