शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

हवामान बदलल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:01 IST

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : आवक घटली अन् मागणी वाढली

लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणहून कर्ज व भांडवल उपलब्ध करून राहिलेली भाजीपाला पिके थोड्या फार प्रमाणात वाचवली. त्यामुळे बळीराजाच्या प्रयत्नांना यश आले. आता भाजीपाला पिकांना चांगला भाव वाढला आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे अतिशय महागडी औषधे फवारणी दिवसातून तीन वेळा करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.सध्या भाजीपाला पिकांचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांचा फायदा शेतकरी वर्गाला काहीच नाही. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त हे समीकरण गुंतागुंतीचे होऊन बसले आहे. या महागाईची झळ सर्वसामान्य शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.सध्या बळीराजा दोन वर्षांपासून कोरोना, परतीचा पाऊस, हवामानातील बदल या अस्मानी संकटांनी त्रस्त असताना आणि यंदा आपल्याला सुटका मिळेल ही आशा असताना परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक इ.मध्ये चिंतेचे वातावरण सध्या दिसत आहे. भाजीपाला आवक घटली असून ग्राहक वर्गातून मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे.भाजीपाल्याचे सध्याचे दर (किलो)टोमॅटो : ४० ते ५० रु.हिरवी मिरची : ८० ते ९० रु.गवार : १०० ते १२० रु.कोबी : २० ते ३० रु. (गड्डा)फ्लॉवर : २० ते ३० रु. (गड्डा)वांगी : ८० ते ८५ रु.शेवगा : ७० ते ७५ रु.मेथी : २० ते २५ रु. (जुडी)शेपू : २० रु. (जुडी)कांदापात : ३० रु. (जुडी)कोथिंबीर : १५ ते २० रु. (जुडी)बटाटे : २५ ते ३० रु.कारले : ११० ते ११५ रु.कांदा : ४५ रु.भेंडी : ७५ रु.सिमला मिरची : ८० रु.गिलके : ३५ रु.डांगर : २५ ते ३० रु. (नग)दोडके : ५५ रु.वाटाणा : ४५ रु.पालक : १५ रु.उसळ : २५ रु.लसूण : १७० रु.भोपळा, मुळा, वाल, डिंगरी, चवळी आदींचे भाव सोयीनुसार घेतले जातात.सध्या जरी भाजीपाला पिकाला भाव मिळत असला तरी ग्राहक वर्गापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. कारण भाजी बाजारपेठेमध्ये आवक अतिशय कमी होत असून, मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मिळत नसल्याने विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- बाळासाहेब सिरसाट, भाजीपाला विक्रेता.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार