शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पंचवटी एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे नाशिककरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:12 IST

पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला जाणा-या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या त्रासाची सवय झाली असून अनेकांनी देवळाली येथून पर्यायी साधने शोधून मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केला. तर काही जण माघारी नाशिकला आले. काही प्रवाशांना कनेक्टींक रेल्वेने पुढे जायचे होते काहींना विमानाने पुढे जायचे होते. परंतु सर्वांचेच हाल झाले.

ठळक मुद्देदेवळाली तीन तास रखडली इगतपूरी पर्यंतच धावली रेल्वे

नाशिक-  उंबरमाळ येथे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या रेल्वे मध्येच थांबवण्यात आल्या. पंचवटी एक्सप्रेस देवळाली येथे तीन तास थांबल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या अधिका-यांना धारेवर धरले. नंतर ही रेल्वे केवळ इगतपूरीपर्यंत पाठविण्यात आली आहे.

नाशिक शहरातून प्रामुख्याने मुंबईस नोकरीस जाणारे चाकरमाने पंचवटी एक्सप्रेसचा उपयोग करतात. सकाळी नेहेमीप्रमाणे रेल्वे सुरू झाली खरी परंतु नंतर मात्र ती देवळाली रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. कसाºयाजवळ तांत्रिक बिघाड सुरू असल्याने रेल्वे काही वेळाने निघेल असे सांगण्यात आल्यांने सुरूवातीला प्रवाशांनी धीर धरला. मात्र नंतर तास दीड तास झाल्यानंतर देखील रेल्वेचे अधिकारी रेल्वे कधी सुरू होणार आणि ती मुंबईस पोहोचणार की नाही याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाºयांना जाब विचारला. रेल्वे सेवा ठप्प आहे. हे रेल्वेप्रशासनानाला माहिती असतानाच देखील त्यांनी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोडहून का सोडली याचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यातच अनेक प्रवाशांनी पैसे मागितले. परंतु त्याबाबतही अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत. रेल्वे कधी सुरू होणार की रद्द होणार याबाबत मुंबई किंवा भूसावळ डीव्हीजनचे अधिकारी निर्णय घेतील असे सांगून अधिका-यांनी माहिती देण्यास टाळल्याने प्रवाशांनी टाळाटाळ केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

दरम्यान, तीन तासानंतर पंचवटी एक्सप्रेस सुरू झाली परंतु इगतपुरीपर्यंतच पाठविण्यात आली. तेथून नागरीकांनी अन्य वाहनांनी मुंबई आणि नाशिक गाठले. 

टॅग्स :Nashikनाशिकcentral railwayमध्य रेल्वे