शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पंचवटी एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे नाशिककरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:12 IST

पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला जाणा-या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या त्रासाची सवय झाली असून अनेकांनी देवळाली येथून पर्यायी साधने शोधून मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केला. तर काही जण माघारी नाशिकला आले. काही प्रवाशांना कनेक्टींक रेल्वेने पुढे जायचे होते काहींना विमानाने पुढे जायचे होते. परंतु सर्वांचेच हाल झाले.

ठळक मुद्देदेवळाली तीन तास रखडली इगतपूरी पर्यंतच धावली रेल्वे

नाशिक-  उंबरमाळ येथे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या रेल्वे मध्येच थांबवण्यात आल्या. पंचवटी एक्सप्रेस देवळाली येथे तीन तास थांबल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या अधिका-यांना धारेवर धरले. नंतर ही रेल्वे केवळ इगतपूरीपर्यंत पाठविण्यात आली आहे.

नाशिक शहरातून प्रामुख्याने मुंबईस नोकरीस जाणारे चाकरमाने पंचवटी एक्सप्रेसचा उपयोग करतात. सकाळी नेहेमीप्रमाणे रेल्वे सुरू झाली खरी परंतु नंतर मात्र ती देवळाली रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. कसाºयाजवळ तांत्रिक बिघाड सुरू असल्याने रेल्वे काही वेळाने निघेल असे सांगण्यात आल्यांने सुरूवातीला प्रवाशांनी धीर धरला. मात्र नंतर तास दीड तास झाल्यानंतर देखील रेल्वेचे अधिकारी रेल्वे कधी सुरू होणार आणि ती मुंबईस पोहोचणार की नाही याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाºयांना जाब विचारला. रेल्वे सेवा ठप्प आहे. हे रेल्वेप्रशासनानाला माहिती असतानाच देखील त्यांनी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोडहून का सोडली याचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यातच अनेक प्रवाशांनी पैसे मागितले. परंतु त्याबाबतही अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत. रेल्वे कधी सुरू होणार की रद्द होणार याबाबत मुंबई किंवा भूसावळ डीव्हीजनचे अधिकारी निर्णय घेतील असे सांगून अधिका-यांनी माहिती देण्यास टाळल्याने प्रवाशांनी टाळाटाळ केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

दरम्यान, तीन तासानंतर पंचवटी एक्सप्रेस सुरू झाली परंतु इगतपुरीपर्यंतच पाठविण्यात आली. तेथून नागरीकांनी अन्य वाहनांनी मुंबई आणि नाशिक गाठले. 

टॅग्स :Nashikनाशिकcentral railwayमध्य रेल्वे