शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे नाशिककरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:12 IST

पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला जाणा-या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या त्रासाची सवय झाली असून अनेकांनी देवळाली येथून पर्यायी साधने शोधून मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केला. तर काही जण माघारी नाशिकला आले. काही प्रवाशांना कनेक्टींक रेल्वेने पुढे जायचे होते काहींना विमानाने पुढे जायचे होते. परंतु सर्वांचेच हाल झाले.

ठळक मुद्देदेवळाली तीन तास रखडली इगतपूरी पर्यंतच धावली रेल्वे

नाशिक-  उंबरमाळ येथे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या रेल्वे मध्येच थांबवण्यात आल्या. पंचवटी एक्सप्रेस देवळाली येथे तीन तास थांबल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या अधिका-यांना धारेवर धरले. नंतर ही रेल्वे केवळ इगतपूरीपर्यंत पाठविण्यात आली आहे.

नाशिक शहरातून प्रामुख्याने मुंबईस नोकरीस जाणारे चाकरमाने पंचवटी एक्सप्रेसचा उपयोग करतात. सकाळी नेहेमीप्रमाणे रेल्वे सुरू झाली खरी परंतु नंतर मात्र ती देवळाली रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. कसाºयाजवळ तांत्रिक बिघाड सुरू असल्याने रेल्वे काही वेळाने निघेल असे सांगण्यात आल्यांने सुरूवातीला प्रवाशांनी धीर धरला. मात्र नंतर तास दीड तास झाल्यानंतर देखील रेल्वेचे अधिकारी रेल्वे कधी सुरू होणार आणि ती मुंबईस पोहोचणार की नाही याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाºयांना जाब विचारला. रेल्वे सेवा ठप्प आहे. हे रेल्वेप्रशासनानाला माहिती असतानाच देखील त्यांनी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोडहून का सोडली याचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यातच अनेक प्रवाशांनी पैसे मागितले. परंतु त्याबाबतही अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत. रेल्वे कधी सुरू होणार की रद्द होणार याबाबत मुंबई किंवा भूसावळ डीव्हीजनचे अधिकारी निर्णय घेतील असे सांगून अधिका-यांनी माहिती देण्यास टाळल्याने प्रवाशांनी टाळाटाळ केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

दरम्यान, तीन तासानंतर पंचवटी एक्सप्रेस सुरू झाली परंतु इगतपुरीपर्यंतच पाठविण्यात आली. तेथून नागरीकांनी अन्य वाहनांनी मुंबई आणि नाशिक गाठले. 

टॅग्स :Nashikनाशिकcentral railwayमध्य रेल्वे