शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू अभावी नाशिक जिल्ह्यातील शासकीय कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:44 IST

नाशिक जिल्ह्यातील २४ वाळू ठिय्यांपैकी जेमतेत सहा ठिय्यांचा आजवर लिलाव झाला असून, लिलावातील ठिय्यांमधून वाळू उपसा करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच न्यायालयाने वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्याने मुदतीत ठिय्यांमधून वाळू उपसा सुरू होऊ शकला नाही.

ठळक मुद्देशासकीय कामांसाठी हजारो ब्रास वाळूची निकड

नाशिक : वाळू उपसावर पर्यावरण मंत्रालय तसेच न्यायालयांनी आणलेल्या निर्बंधामुळे वाळूच्या निर्माण झालेला प्रचंड तुटवड्यामुळे शासकीय कामेही ठप्प झाली असून, नाशिक जिल्ह्यातील कामे मुदतीत पूर्ण करता यावे यासाठी कामे घेतलेल्या ठेकेदारांनी तालुक्याच्या तहसीलदाराकडे वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील कामांसाठी सुमारे साडेसहा हजार ब्रास वाळूची नितांत निकड असून, गौणखनिज कारवाईपोटी जप्त करण्यात आलेली वाळू जेमतेम २३ ब्रास इतकीच असल्याने उर्वरित वाळू कोठून उपलब्ध करून द्यावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.नाशिक जिल्ह्यातील २४ वाळू ठिय्यांपैकी जेमतेत सहा ठिय्यांचा आजवर लिलाव झाला असून, लिलावातील ठिय्यांमधून वाळू उपसा करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच न्यायालयाने वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्याने मुदतीत ठिय्यांमधून वाळू उपसा सुरू होऊ शकला नाही. खासगी एजन्सीच्या माध्यमातून मायनिंग प्लॅनिंग करून घेतल्यानंतर वाळू उपसा सुरू होणे अपेक्षित असले तरी, बोलीत घेतलेल्या ठिय्यापेक्षा अधिक वाळू उपसाकडे ठेकेदाराचा कल असल्यामुळे त्याला चाप लावण्याचे काम महसूल यंत्रणेकडून होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत वाळूची टंचाई निर्माण होऊन वाळूचे ब्रासमागील दरात दुप्पटीने वाढ झाल्याचे पाहून अवैध वाळू तस्करीला सुरुवात झाली आहे. ती रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आल्यावर नाशिकमध्ये वाळू मिळत नसल्याची ओरड होऊ लागली असून, त्याचा परिणाम शासकीय कामांवरच अधिक होत आहे. या संदर्भात ठेकेदारांनी व सार्वजनिक बांधकाम खात्याने थेट जिल्हाधिका-यांनाच पत्र लिहून वाळू उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. वाळू मिळत नसल्याने देवळा नगरपंचायतीच्या अंगणवाडी, प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम रखडले आहे, तर महाराष्टÑ पोलीस अकादमीत नवीन व जुन्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन बांधकाम तातडीने पूर्ण करावयाचे असल्याने त्यासाठी वाळूची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने म्हटले आहे. नाशिकरोड येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केले असले तरी, वाळूचे कारण दाखवून ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने वाळू द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातही अशाच प्रकारे कामे रखडली असून, सुमारे साडेसहा हजारांहून अधिक ब्रास वाळूची गरज आहे, परंतु प्रशासनाकडे फक्त २३ ब्रास वाळू उपलब्ध असून, त्यातून एकही काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक