शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

प्रेक्षकांअभावी माहितीपट मृतप्राय

By admin | Updated: December 25, 2015 23:50 IST

प्रेक्षकांअभावी माहितीपट मृतप्राय

नाशिक : या देशात माहितीपट फक्त महोत्सवांपुरते उरले आहेत. केबलचे राज्य आल्यानंतर ते अधिकच दुर्लक्षित झाले असून, लोक हौसेने माहितीपट बनवत असले, तरी त्यांना पाहायला प्रेक्षकच नाहीत. प्रेक्षकांअभावी हे माध्यम मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची खंत प्रख्यात माहितीपट दिग्दर्शक व निर्मात्या निष्ठा जैन यांनी व्यक्त केली. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महोत्सवाचे संयोजक भिला ठाकरे, अर्चना भट उपस्थित होत्या. जैन म्हणाल्या, पूर्वी ‘दूरदर्शन’वर माहितीपट दाखवले जात असत; मात्र केबल आल्यानंतर तेही बंद पडले. आता माहितीपट काही महोत्सवांतच पाहायला मिळतात. त्यांना प्रेक्षकही मिळत नसल्याने परिस्थिती वाईट झाली आहे. आपल्या ‘गुलाबी गॅँग’ या माहितीपटाविषयी त्या म्हणाल्या, बॉलिवूडमधील या विषयावरच्या चित्रपटाशी आपल्या माहितीपटाचा काही संबंध नाही. चित्रपट निर्माण करताना त्यांनी आपला माहितीपट पाहिलाही नाही. तो पाहिला असता, तर बरे झाले असते. आपण बुंदेलखंडमध्ये गुलाबी गॅँगसोबत पाच महिने प्रत्यक्ष राहून माहितीपट तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भिला ठाकरे यांनी फिल्म फेस्टिव्हलमागील उद्देश स्पष्ट केला. वंचितांच्या चित्रपटांना स्थान देण्यासाठी हा महोत्सव सुरू केल्याचे ते म्हणाले. श्वेता गाडगीळ व आशिष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवात आज दिवसभरात कावळा, काव्यकल्लोळ, भूक, आमचं गाव आमचं सरकार, कालिख, बालविवाह, उष:काल होता होता आदि सुमारे वीस ते बावीस लघुपट, चित्रपट सादर करण्यात आले. उद्या सकाळी १० पासून रात्री ९.३०पर्यंत सुमारे २८ चित्रपट दाखवले जाणार आहेत.