शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:44 IST

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे शहर परिसरात कडाक्याची थंडी द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढले

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.आधी बेमोसमी पावसाचा फटका आणि नंतर सलग ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशके व औषधांची फवारणी करून वाचवलेल्या द्राक्षबागा आता कडाक्याच्या थंडीमुळे संकटात सापडल्या असून, मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत वातावरणात कमालीचे चढ-उतार होत आहेत. दिवाळीपश्चात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री काहीसे थंड असे वातावरण कायम आहे. त्यामुळे धड ना थंडी ना उकाडा अशी दोलायमान अवस्था असताना काही दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसानंतर वातावरणात बदल होऊन सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला.द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढलेसंक ट टाळण्यासाठी शेतकºयांना अंतिम टप्प्यात महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता माल काढणीला आला असताना तपमान घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.