शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:44 IST

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे शहर परिसरात कडाक्याची थंडी द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढले

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.आधी बेमोसमी पावसाचा फटका आणि नंतर सलग ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशके व औषधांची फवारणी करून वाचवलेल्या द्राक्षबागा आता कडाक्याच्या थंडीमुळे संकटात सापडल्या असून, मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत वातावरणात कमालीचे चढ-उतार होत आहेत. दिवाळीपश्चात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री काहीसे थंड असे वातावरण कायम आहे. त्यामुळे धड ना थंडी ना उकाडा अशी दोलायमान अवस्था असताना काही दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसानंतर वातावरणात बदल होऊन सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला.द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढलेसंक ट टाळण्यासाठी शेतकºयांना अंतिम टप्प्यात महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता माल काढणीला आला असताना तपमान घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.