शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

राजापूर परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:54 IST

संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने विहीरी व छोटेमोठे बंधारे  कोरडेठाक पडल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू करण्यात आला आहे. तसेच पीकेही करपू लागली असून दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

राजापूर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील वाड्या-वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीपाची संपूर्ण पिके वाया गेली आहेत. मका पीक हिरवे दिसतात, परंतु दाणे भरण्यासाठी पुरेसा पाऊस नाही. शेंदरी बोंडअळीने कपाशीचेही नुकसान झाले. पोळ कांद्याची लागवड केली परंतुा पावसाअभावी रोपे वाळली आहेत. मशागत व लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहीरींना पाणी नाही, मजुरांना कामे नाहीत या चिंतेने शेतकरी व मजूर हवालदिल झाले आहेत. राजापूर हे गाव उंचावर असल्याने येथे कूठल्याही सिंचनाची सूविधा नाही. त्यामुळे दूष्काळ येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेला आहे. निसर्गाच्या भरवशावर शेती कशी करावी व पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. पिके करपून गेल्याने एक महिन्यानंतर जनावरांसाठी चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने राजापूर परिसरातील दूष्काळसदूश परिस्थितीचा आढावा घेऊन या भागात दुष्काळ जाहीर करावा, पिकाची नूकसान भरपाई द्यावी व दुष्काळीे कामे सुरू करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा