शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाटोदा परिसरात दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: March 16, 2016 23:53 IST

टॅँकरची मागणी : हंडाभर पाण्यासाठी सकाळपासून सुरू होते धावपळं

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा व परिसरातील ठाणगाव, कानडी, मुरमी, आडगाव रेपाळ, पिंपळगाव लेप, भाटगाव, जऊळके, देवरगाव या गावांत सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. पाण्यासाठी पहाटेपासून ते दिवस मावळेपर्यंत धावाधाव करावी लागते तेव्हा कुठे घागरभर पाणी मिळते असे चित्र बहुतांश गावांत पाहावयास मिळत आहे.मागील तीन वर्षांपासून पर्जन्यमानात सातत्याने घट झाली. पाऊस न झाल्यामुळे शेतीच्या हंगामात पेरण्या करूनही शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसेही वाया गेले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्यांच्या विहिरी, बोअरलाही पाणी पातळी खालावल्यामुळे पाणी राहिले नाही. अशा परिस्थितीत शेतातील पिकांना पाणी कुठून देणार, हा विचार करून शेतकरी शेतातील कामे गुंडाळून बसला आहे. पाऊस न पडल्याने पाटोदा व परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परिसरातील मुरमी, आडगाव रेपाळ, बाळापूर, खैरगव्हाण या गावांना तीन- चार महिन्यांपासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील काही गावांना भर पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा केला जात होता यावरूनच या भागातील दुष्काळाची दाहकता दिसून येते.चटके देणाऱ्या उन्हामुळे ग्रामीण भागातील पाणवठे कोरडे होऊन जनावरांनाही प्यायला पाणी मिळण्याची मारामार सुरू आहे. सद्यस्थितीला पाटोदा परिसरात हजार फूट खोलवरदेखील पाणी मिळेल याची खात्री राहिलेली नाही. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठला असल्याने रात्री- बेरात्री विहिरींच्या तळापर्यंत उतरून पाणी भरण्याची धडपड करीत आहेत. काही बोअरला दिवसा पाण्याचा थेंबही येत नाही. परंतु रात्री उशिरा बोअर सुरू केले तर एखादे भांडे पाणी मिळण्याची खात्री वाटत असल्याने रात्रीच्या वेळी पाणी घेण्यासाठी महिला व पुरुषांची लगबग दिसत आहे. प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.