शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

वाहनचालकांना १५ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:15 IST

नाशिक : लॉकडाउन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली असून, आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नाशिक : लॉकडाउन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली असून, आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चला झालेल्या जनता कर्फ्युनंतर २३ पासून संपूर्ण देशात शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे असतानाही मिळेल ती संधी शोधून काहीही कारण सांगून अनेक युवक तसेच नागरिक दुचाकीवरून संचार करत आहेत. शहरात कोरोनाचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळ्यानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली असून, प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांनी मिळून तीनशेहून अधिक वाहने जप्त केली आहेत. गस्ती पथके सतत गस्त घालत असून, वाहतूक शाखेने वाहने जप्त करण्यासह अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार २३ मार्चपासून वाहनांवर कारवाई करत त्यांच्यावर १५ लाख ५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी २ लाख ८३ हजार दोनशे रुपये दंड रोख स्वरूपात वसूल केला आहे. तर १२ लाख २२ हजार सहाशे रुपयांचे ई चलान कापण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनचालकांना आॅनलाइन दंड करण्यात आला असून, त्याचे एसएमएस त्यांना पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक