शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

महामार्ग बसस्थानकाला वाहनांचा विळखा

By admin | Updated: December 5, 2015 22:44 IST

महामार्ग बसस्थानकाला वाहनांचा विळखा

इंदिरानगर : मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकालगतचा रस्ता अद्यापही प्रवासी वाहनांमुळे आणि अनधिकृत टपऱ्यांच्या विळखातून मुक्त झालेला नाही. त्यामुळे महामार्ग बसस्थानक केव्हा मोकळा श्वास घेणार? असा प्रश्न आहे.मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगरसह परिसरातील हजारोच्या संख्येने राहणाऱ्या नागरिकांना शहरात ये-जा करणाऱ्या महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे आणि महामार्ग बसस्थानकातून कसारा, नगर, शेगाव, शिर्डी, संगमनेर, नेवासा यांसह विविध शहरांना आणि गावांना दररोज बसेस फेऱ्या मारता. त्यामुळे दिवसभर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटविल्या होत्या आणि रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. रस्त्याचे डांबरीकरण आणि त्यावर ट्रॅव्हल्सच्या बसेस तीन ते चार तास रस्त्यावर उभ्या असतात. तर त्यात आता चारचाकी लहान-मोठी प्रवासी वाहनेही उभी राहात असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी जणू काही सूत्रच बनले आहे. तसेच काही विक्रेतेही पुन्हा रस्त्यावरच ठाण मांडून बसून असतात. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. (वार्ताहर)