शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

फळ पिकांसाठी ठिबक सिंचन गरजेचे

By admin | Updated: October 9, 2015 01:18 IST

फळ पिकांसाठी ठिबक सिंचन गरजेचे

नाशिक : वातावरणातील बदल आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता फळपिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, एनआरसी पुण्याचे संचालक एस. डी. सावंत, केंद्रीय कृषी मंत्रालयातील कृषी सल्लागार दीपेंद्र चव्हाण, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव आदि उपस्थित होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पावसाचे प्रमाण मर्यादित असून, धरणांची क्षमता तत्काळ वाढविणे शक्य नाही. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.