शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:45 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौराईवाडी : पाणीप्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान

राजेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत दुर्गम म्हैसवळण घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या चौराईवाडीतील ग्रामस्थांना आजवर पिण्याचे पाणी मिळाले नव्हते. अडसरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच संतू साबळे यांनी ही अत्यंत गरजेची समस्या अखेर सोडविली. अडसरे येथे दोन तीनशे लोकसंख्या असलेल्या चौराईवाडीत सण २०१२ मध्ये आदिवासी उपाययोजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले होते. त्या टाक्यांमध्ये आजपर्यंत पिण्याचे पाणी आले नव्हते, मात्र सरपंच संतू साबळे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत स्वत: ग्रामपंचायतीच्या निधीतून खर्च करून पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामपंचायतीवर वर्ग नसतानादेखील गावच्या मुख्य विहिरीतून ते या तीन किलोमीटर दूर अंतर असलेल्या चौराईवाडीपर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला.चौराईवाडीतील महिलांची पाण्यासाठीची रोज तारेवरची कसरत होत होती. अखेर मी ग्रामपंचायत निवडणूक काळात येथील ग्रामस्थांना शब्द दिला होता की, मी निवडून येवो अथवा ना येवो मी आपला पाणीप्रश्न सोडविणार. याच मुद्द्यावर मला जनतेने भरघोस मताधिक्याने सरपंच बनविले. त्यानंतर मी सर्वांना एकत्र घेऊन चार-पाच महिन्यांत महिलांचा डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. - संतू साबळे, सरपंच, अडसरेघरापर्यंत नळग्रामस्थांना थेट घरापर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांच्या दारापर्यंत पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याचे नळ पोहोचविले. या वाडीत पहिल्यांदाच पाणी पोहोचून गेल्या आठ-दहा वर्षांपासून रिकाम्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आणल्याने व कायमचा पाणीप्रश्न मिटल्याने येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच संतू साबळे, उपसरपंच वामन साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, शंकर भांगरे, शिवाजी चौरे, जयश्री जाधव, अर्चना साबळे, ज्योती चौरे, कर्मचारी काळू चौरे यांचे आभार मानले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater transportजलवाहतूक