शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:45 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौराईवाडी : पाणीप्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान

राजेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत दुर्गम म्हैसवळण घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या चौराईवाडीतील ग्रामस्थांना आजवर पिण्याचे पाणी मिळाले नव्हते. अडसरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच संतू साबळे यांनी ही अत्यंत गरजेची समस्या अखेर सोडविली. अडसरे येथे दोन तीनशे लोकसंख्या असलेल्या चौराईवाडीत सण २०१२ मध्ये आदिवासी उपाययोजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले होते. त्या टाक्यांमध्ये आजपर्यंत पिण्याचे पाणी आले नव्हते, मात्र सरपंच संतू साबळे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत स्वत: ग्रामपंचायतीच्या निधीतून खर्च करून पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामपंचायतीवर वर्ग नसतानादेखील गावच्या मुख्य विहिरीतून ते या तीन किलोमीटर दूर अंतर असलेल्या चौराईवाडीपर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला.चौराईवाडीतील महिलांची पाण्यासाठीची रोज तारेवरची कसरत होत होती. अखेर मी ग्रामपंचायत निवडणूक काळात येथील ग्रामस्थांना शब्द दिला होता की, मी निवडून येवो अथवा ना येवो मी आपला पाणीप्रश्न सोडविणार. याच मुद्द्यावर मला जनतेने भरघोस मताधिक्याने सरपंच बनविले. त्यानंतर मी सर्वांना एकत्र घेऊन चार-पाच महिन्यांत महिलांचा डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. - संतू साबळे, सरपंच, अडसरेघरापर्यंत नळग्रामस्थांना थेट घरापर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांच्या दारापर्यंत पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याचे नळ पोहोचविले. या वाडीत पहिल्यांदाच पाणी पोहोचून गेल्या आठ-दहा वर्षांपासून रिकाम्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आणल्याने व कायमचा पाणीप्रश्न मिटल्याने येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच संतू साबळे, उपसरपंच वामन साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, शंकर भांगरे, शिवाजी चौरे, जयश्री जाधव, अर्चना साबळे, ज्योती चौरे, कर्मचारी काळू चौरे यांचे आभार मानले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater transportजलवाहतूक