शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:45 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौराईवाडी : पाणीप्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान

राजेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत दुर्गम म्हैसवळण घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या चौराईवाडीतील ग्रामस्थांना आजवर पिण्याचे पाणी मिळाले नव्हते. अडसरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच संतू साबळे यांनी ही अत्यंत गरजेची समस्या अखेर सोडविली. अडसरे येथे दोन तीनशे लोकसंख्या असलेल्या चौराईवाडीत सण २०१२ मध्ये आदिवासी उपाययोजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले होते. त्या टाक्यांमध्ये आजपर्यंत पिण्याचे पाणी आले नव्हते, मात्र सरपंच संतू साबळे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत स्वत: ग्रामपंचायतीच्या निधीतून खर्च करून पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामपंचायतीवर वर्ग नसतानादेखील गावच्या मुख्य विहिरीतून ते या तीन किलोमीटर दूर अंतर असलेल्या चौराईवाडीपर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला.चौराईवाडीतील महिलांची पाण्यासाठीची रोज तारेवरची कसरत होत होती. अखेर मी ग्रामपंचायत निवडणूक काळात येथील ग्रामस्थांना शब्द दिला होता की, मी निवडून येवो अथवा ना येवो मी आपला पाणीप्रश्न सोडविणार. याच मुद्द्यावर मला जनतेने भरघोस मताधिक्याने सरपंच बनविले. त्यानंतर मी सर्वांना एकत्र घेऊन चार-पाच महिन्यांत महिलांचा डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. - संतू साबळे, सरपंच, अडसरेघरापर्यंत नळग्रामस्थांना थेट घरापर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांच्या दारापर्यंत पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याचे नळ पोहोचविले. या वाडीत पहिल्यांदाच पाणी पोहोचून गेल्या आठ-दहा वर्षांपासून रिकाम्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आणल्याने व कायमचा पाणीप्रश्न मिटल्याने येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच संतू साबळे, उपसरपंच वामन साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, शंकर भांगरे, शिवाजी चौरे, जयश्री जाधव, अर्चना साबळे, ज्योती चौरे, कर्मचारी काळू चौरे यांचे आभार मानले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater transportजलवाहतूक