शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:22 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, बंडूनाना भाबड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, नगरसेवक नामदेव लोंढे, भाजपाचे पंचायत समितीतील गटनेते विजय गडाख, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सुधीर रावले, मल्लू पाबळे, अरुण वाघ, शीतल कानडी, रामभाऊ लोणारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सिन्नर बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल व कर्जमाफी, पीकांचे पंचनामे करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात आदिंसह विविध फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, पोलीस निरीक्षक मुंकुंद देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.तालुक्यात नियोजन नसल्याने पाणीयोजना कोलमडल्या आहेत. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी नाही. लोकप्रतिनिधी समन्वय समितीचे अध्यक्ष असतांना दुष्काळी आढावा बैठक नसल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला. आता लक्ष वेधले तरच शासन आपल्या दारी येईल. मोर्चा शासनाच्या किंवा आमदारांच्या विरोधात नसून लक्ष वेधण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. विद्यमान आमदार व मी दोघेही सत्तेत आहे. मी भाजपात असून मोर्चा काढायला घाबरत नाही, तुम्ही का घाबरता असा सवाल आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव न घेता उपस्थितीत करुन कोकाटे यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकत्र येण्याचे आवाहन केले.सत्तेत असो किंवा नसो दुष्काळ सर्वांना सारखाच आहे. मात्र मोर्चाबाबत वेगळा विचार का केला जात आहे असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असतांना व आमदार असतांना तालुक्यात जनावरांसाठी छावण्या सुुरु होत्या. शेतकºयांना घरपोहच चारा केला. टॅँकर सुरु करतांना कधी अडचण आली नाही. आता मात्र नियोजन नसल्याने व तालुक्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शेतकºयांवर अशी परिस्थिती ओढावल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. आता सुरु असलेल्या विविध योजना केवळ पैसे खाण्यासाठी असून जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक आमदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. केवळ पत्रव्यवहार करुन प्रश्ने सुटत नाही, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासह बैठका घ्याव्या लागतात. मात्र विद्यमान आमदारांचा अधिकाºयांवर वचक नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.स्थानिक आमदारांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने व एकही टंचाई आढावा बैठक न झाल्याने लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढावा लागल्याचे कोकाटे म्हणाले. भविष्यात दुष्काळाचे संकट गडद असून त्यासाठी सरकारची गरज भासणार आहे. त्यासाठी मदत मिळावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे कोकाटे म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरी