शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:22 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, बंडूनाना भाबड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, नगरसेवक नामदेव लोंढे, भाजपाचे पंचायत समितीतील गटनेते विजय गडाख, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सुधीर रावले, मल्लू पाबळे, अरुण वाघ, शीतल कानडी, रामभाऊ लोणारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सिन्नर बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल व कर्जमाफी, पीकांचे पंचनामे करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात आदिंसह विविध फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, पोलीस निरीक्षक मुंकुंद देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.तालुक्यात नियोजन नसल्याने पाणीयोजना कोलमडल्या आहेत. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी नाही. लोकप्रतिनिधी समन्वय समितीचे अध्यक्ष असतांना दुष्काळी आढावा बैठक नसल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला. आता लक्ष वेधले तरच शासन आपल्या दारी येईल. मोर्चा शासनाच्या किंवा आमदारांच्या विरोधात नसून लक्ष वेधण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. विद्यमान आमदार व मी दोघेही सत्तेत आहे. मी भाजपात असून मोर्चा काढायला घाबरत नाही, तुम्ही का घाबरता असा सवाल आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव न घेता उपस्थितीत करुन कोकाटे यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकत्र येण्याचे आवाहन केले.सत्तेत असो किंवा नसो दुष्काळ सर्वांना सारखाच आहे. मात्र मोर्चाबाबत वेगळा विचार का केला जात आहे असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असतांना व आमदार असतांना तालुक्यात जनावरांसाठी छावण्या सुुरु होत्या. शेतकºयांना घरपोहच चारा केला. टॅँकर सुरु करतांना कधी अडचण आली नाही. आता मात्र नियोजन नसल्याने व तालुक्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शेतकºयांवर अशी परिस्थिती ओढावल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. आता सुरु असलेल्या विविध योजना केवळ पैसे खाण्यासाठी असून जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक आमदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. केवळ पत्रव्यवहार करुन प्रश्ने सुटत नाही, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासह बैठका घ्याव्या लागतात. मात्र विद्यमान आमदारांचा अधिकाºयांवर वचक नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.स्थानिक आमदारांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने व एकही टंचाई आढावा बैठक न झाल्याने लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढावा लागल्याचे कोकाटे म्हणाले. भविष्यात दुष्काळाचे संकट गडद असून त्यासाठी सरकारची गरज भासणार आहे. त्यासाठी मदत मिळावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे कोकाटे म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरी