शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:22 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, बंडूनाना भाबड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, नगरसेवक नामदेव लोंढे, भाजपाचे पंचायत समितीतील गटनेते विजय गडाख, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सुधीर रावले, मल्लू पाबळे, अरुण वाघ, शीतल कानडी, रामभाऊ लोणारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सिन्नर बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल व कर्जमाफी, पीकांचे पंचनामे करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात आदिंसह विविध फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, पोलीस निरीक्षक मुंकुंद देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.तालुक्यात नियोजन नसल्याने पाणीयोजना कोलमडल्या आहेत. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी नाही. लोकप्रतिनिधी समन्वय समितीचे अध्यक्ष असतांना दुष्काळी आढावा बैठक नसल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला. आता लक्ष वेधले तरच शासन आपल्या दारी येईल. मोर्चा शासनाच्या किंवा आमदारांच्या विरोधात नसून लक्ष वेधण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. विद्यमान आमदार व मी दोघेही सत्तेत आहे. मी भाजपात असून मोर्चा काढायला घाबरत नाही, तुम्ही का घाबरता असा सवाल आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव न घेता उपस्थितीत करुन कोकाटे यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकत्र येण्याचे आवाहन केले.सत्तेत असो किंवा नसो दुष्काळ सर्वांना सारखाच आहे. मात्र मोर्चाबाबत वेगळा विचार का केला जात आहे असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असतांना व आमदार असतांना तालुक्यात जनावरांसाठी छावण्या सुुरु होत्या. शेतकºयांना घरपोहच चारा केला. टॅँकर सुरु करतांना कधी अडचण आली नाही. आता मात्र नियोजन नसल्याने व तालुक्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शेतकºयांवर अशी परिस्थिती ओढावल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. आता सुरु असलेल्या विविध योजना केवळ पैसे खाण्यासाठी असून जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक आमदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. केवळ पत्रव्यवहार करुन प्रश्ने सुटत नाही, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासह बैठका घ्याव्या लागतात. मात्र विद्यमान आमदारांचा अधिकाºयांवर वचक नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.स्थानिक आमदारांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने व एकही टंचाई आढावा बैठक न झाल्याने लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढावा लागल्याचे कोकाटे म्हणाले. भविष्यात दुष्काळाचे संकट गडद असून त्यासाठी सरकारची गरज भासणार आहे. त्यासाठी मदत मिळावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे कोकाटे म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरी