शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू होता. त्यांचे अंतिम लक्ष्य हे हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे होते, असा दावा ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे यांनी केला. आंबेडकरांना ठराविक चौकटीत बंदिस्त करणे हे त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वावर अन्याय करण्यासारखे ठरेल, असेही ते म्हणाले. साप्ताहिक विवेक व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पतंगे लिखित ‘सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल विचारमंचावर उपस्थित होते. पतंगे म्हणाले की, बाबासाहेबांवर टोकाचा भक्तिभाव व्यक्त करणारी व टीका करणारी अशी दोन्ही गटांची माणसे समाजात आहेत. बाबासाहेबांबद्दल बुद्धीमध्ये वाळवी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. बाबासाहेबांचा लढा हा हिंदू धर्मशास्त्राविरोधात होता, हिंदू परंपरा नष्ट झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. तथापि, डॉ. आंबेडकर यांचे समग्र व्यक्तिमत्त्व अत्यंत व्यापक होते. दलितमुक्ती हा त्यांच्या कामाचा केवळ आरंभबिंदू होता. हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे हे त्यांचे लक्ष्य होते. देशातील स्त्रियांची प्रगती, बाळंतपणाची रजा, बालविवाहावर बंदी, मुलांना पित्याच्या संपत्तीत वाटा, कामगारांना आठ तासांच्या कामाची मर्यादा आदि अनेक गोष्टींचे श्रेय बाबासाहेबांचे असल्याचेही ते म्हणाले. विनायकदादा पाटील यांनी सांगितले की, मोठ्या कलाकृती, व्यक्तिमत्त्वे समजण्यास कठीण असतात. आपले वय वाढते, तसतशी ती अधिक कळत जातात. आंबेडकर, गांधी व विवेकानंद या व्यक्तिमत्त्वांनी सृष्टीला धक्के दिले. आंबेडकरांना एखादा धर्म जखडून ठेवू शकत नाही. ते युगप्रवर्तक नेते होते. अशा व्यक्ती माणूस नव्हे, तर देवत्वाचे अधिकारी असतात, सृष्टीचे उद्रेक असतात. प्रारंभी शीतल खोत यांनी ‘साप्ताहिक विवेक’विषयी माहिती दिली. ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’च्या आंबेडकर विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले. रवींद्र बेडेकर यांनी गीत सादर केले. बापू जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)