शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू होता. त्यांचे अंतिम लक्ष्य हे हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे होते, असा दावा ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे यांनी केला. आंबेडकरांना ठराविक चौकटीत बंदिस्त करणे हे त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वावर अन्याय करण्यासारखे ठरेल, असेही ते म्हणाले. साप्ताहिक विवेक व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पतंगे लिखित ‘सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल विचारमंचावर उपस्थित होते. पतंगे म्हणाले की, बाबासाहेबांवर टोकाचा भक्तिभाव व्यक्त करणारी व टीका करणारी अशी दोन्ही गटांची माणसे समाजात आहेत. बाबासाहेबांबद्दल बुद्धीमध्ये वाळवी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. बाबासाहेबांचा लढा हा हिंदू धर्मशास्त्राविरोधात होता, हिंदू परंपरा नष्ट झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. तथापि, डॉ. आंबेडकर यांचे समग्र व्यक्तिमत्त्व अत्यंत व्यापक होते. दलितमुक्ती हा त्यांच्या कामाचा केवळ आरंभबिंदू होता. हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे हे त्यांचे लक्ष्य होते. देशातील स्त्रियांची प्रगती, बाळंतपणाची रजा, बालविवाहावर बंदी, मुलांना पित्याच्या संपत्तीत वाटा, कामगारांना आठ तासांच्या कामाची मर्यादा आदि अनेक गोष्टींचे श्रेय बाबासाहेबांचे असल्याचेही ते म्हणाले. विनायकदादा पाटील यांनी सांगितले की, मोठ्या कलाकृती, व्यक्तिमत्त्वे समजण्यास कठीण असतात. आपले वय वाढते, तसतशी ती अधिक कळत जातात. आंबेडकर, गांधी व विवेकानंद या व्यक्तिमत्त्वांनी सृष्टीला धक्के दिले. आंबेडकरांना एखादा धर्म जखडून ठेवू शकत नाही. ते युगप्रवर्तक नेते होते. अशा व्यक्ती माणूस नव्हे, तर देवत्वाचे अधिकारी असतात, सृष्टीचे उद्रेक असतात. प्रारंभी शीतल खोत यांनी ‘साप्ताहिक विवेक’विषयी माहिती दिली. ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’च्या आंबेडकर विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले. रवींद्र बेडेकर यांनी गीत सादर केले. बापू जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)