शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:20 IST

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.

ठळक मुद्देसिन्नर: मराठा क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले. सखोल संशोधनांती मराठा समाज हा मागास असल्याचे अहवाल दिला आहे. त्यानंतर सरकारने शिक्षण आणि नोकरीत मराठा तरूणांना आरक्षण दिले. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राज्य सरकार व महाधिवक्ता न्यायालयात सक्षमपणे बाजु मांडण्यास कमी पडले ही बाब खचितच दुर्दैवी आहे. सर्वौच्च न्यायालयात तामिळनाडूचे आरक्षण टिकत आहे. त्याला कुठलेही स्थगिती दिली जात नाही. मग महाराष्ट्राबाबत व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच असे का घडत आहे ? राजकारणाच्या कुरघोडीतुन जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षणापासुन दर ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत समाजातील गोरगरीब मुलांच्या भवितव्याचा विचार करून कायद्याच्या कसोटीवर टिकेल. अशी प्रभावी कायदेशीर यंत्रणा उभी करून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, हरीभाऊ तांबे, बाळासाहेब हांडे, आनंदा सालमुठे, विनायक सांगळे, शामसुंदर झळके, पांडुरंग वारुंगसे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, प्रा. राजाराम मुंगसे, पंकज जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :marathaमराठाsinnar-acसिन्नर