शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:20 IST

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.

ठळक मुद्देसिन्नर: मराठा क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले. सखोल संशोधनांती मराठा समाज हा मागास असल्याचे अहवाल दिला आहे. त्यानंतर सरकारने शिक्षण आणि नोकरीत मराठा तरूणांना आरक्षण दिले. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राज्य सरकार व महाधिवक्ता न्यायालयात सक्षमपणे बाजु मांडण्यास कमी पडले ही बाब खचितच दुर्दैवी आहे. सर्वौच्च न्यायालयात तामिळनाडूचे आरक्षण टिकत आहे. त्याला कुठलेही स्थगिती दिली जात नाही. मग महाराष्ट्राबाबत व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच असे का घडत आहे ? राजकारणाच्या कुरघोडीतुन जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षणापासुन दर ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत समाजातील गोरगरीब मुलांच्या भवितव्याचा विचार करून कायद्याच्या कसोटीवर टिकेल. अशी प्रभावी कायदेशीर यंत्रणा उभी करून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, हरीभाऊ तांबे, बाळासाहेब हांडे, आनंदा सालमुठे, विनायक सांगळे, शामसुंदर झळके, पांडुरंग वारुंगसे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, प्रा. राजाराम मुंगसे, पंकज जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :marathaमराठाsinnar-acसिन्नर