शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:20 IST

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.

ठळक मुद्देसिन्नर: मराठा क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले. सखोल संशोधनांती मराठा समाज हा मागास असल्याचे अहवाल दिला आहे. त्यानंतर सरकारने शिक्षण आणि नोकरीत मराठा तरूणांना आरक्षण दिले. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राज्य सरकार व महाधिवक्ता न्यायालयात सक्षमपणे बाजु मांडण्यास कमी पडले ही बाब खचितच दुर्दैवी आहे. सर्वौच्च न्यायालयात तामिळनाडूचे आरक्षण टिकत आहे. त्याला कुठलेही स्थगिती दिली जात नाही. मग महाराष्ट्राबाबत व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच असे का घडत आहे ? राजकारणाच्या कुरघोडीतुन जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षणापासुन दर ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत समाजातील गोरगरीब मुलांच्या भवितव्याचा विचार करून कायद्याच्या कसोटीवर टिकेल. अशी प्रभावी कायदेशीर यंत्रणा उभी करून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, हरीभाऊ तांबे, बाळासाहेब हांडे, आनंदा सालमुठे, विनायक सांगळे, शामसुंदर झळके, पांडुरंग वारुंगसे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, प्रा. राजाराम मुंगसे, पंकज जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :marathaमराठाsinnar-acसिन्नर