शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधानंतर आता हॉटेल सुरू झाली असून, अनेक खवय्यांची पावल हॉटेलांकडे वळू लागली आहेत; पण पावसाळी वातावरण ...

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधानंतर आता हॉटेल सुरू झाली असून, अनेक खवय्यांची पावल हॉटेलांकडे वळू लागली आहेत; पण पावसाळी वातावरण पाहता हॉटेल सुरू झाली म्हणून लगेचच जिभेचे लाड करू नका असा सल्ला आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते आणि याच काळात वातावरणात बॅक्टेरिया आणि वायरसेसचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे बाहेरच्या खाण्याने पोटाचे विकार जडण्याचा धोका असतो. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावेत. शक्यतो घरचेच नाष्टा, जेवण घ्यावे यामुळे आपली प्रकृतीही उत्तम राहते आणि सकस अन्नही पोटात जात असल्याने आपला उत्साह टिकून राहत असतो, असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. रस्त्यावरील पदार्थ तयार करताना वापरलेले पाणी व्यवस्थित गाळलेले आणि उकळलेलेही नसते त्यामळे असे पदार्थ खाण्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. यासाठी पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे असे आहारतज्ज्ञांकडून सांगितले जाते.

चौकट-

पावसाळ्यात हे खायला हवे

पावसाळ्यात उकडलेले, उकळलेले आणि भाजलेले ताजे अन्न खावे.

घरचे वरण-भात, भाजी-पोळी यांचा जेवणात समावेश असावा.

सर्व प्रकारच्या फळभाज्या चांगल्या शिजवून खाणे चांगले असते.

चौकट-

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

बाहेरचे पिझ्झा, बर्गर, वडापाव, बेकरी पदार्थ आणि जंक फुड हे पदार्थ या दिवसात खाऊ नये. त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतरवेळी हिरव्या पालेभाज्या खाणे चांगले असले तरी पावसाळ्यात शक्यतो हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत कारण पाणांवर दूषित पाणी जमा होऊन त्यातून बॅक्टेरियाचा फैलाव होत असतो.

बटाटा, कोबी, फ्लॉवर, हिरवा वाटाणा, आदी वातुळ पदार्थ खाण्याचे टाळावे किंवा कमी खावेत.

पावसाळ्यात पोटाच्या विकाराबरोबरच अस्थमा, संधीवाताचे रुग्णही आढळतात. यामुळे वात वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत.

चौकट-

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. याच काळात वातावरणात बॅक्टेरिया आणि वायरसेस यांचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेले असते. रस्त्यावरील उघड्या पदार्थांवर बॅक्टेरियांचे प्रमाण अधिक असते. शिवाय हे पदार्थ बनविण्यासाठी वापरलेले पाणी बऱ्याचवेळा गाळलेले आणि उकळलेले नसते, त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊच नये.

चौकट-

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

कोट-

पावसाळ्यात आहारात कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. शक्यतो घरचे वरण-भात, भाजी-पोळी यांचाच रोजच्या जेवणात समावेश करावा. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असल्याने आजार बळावण्याचा धोका अधिक असतो. यामुळे उघड्यावरचे आणि बाहेरचे अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. - रश्मी सोमाणी, आहारतज्ज्ञ

कोट-

पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाणे टाळाव्यात कारण पाणांवर दूषित पाणी पडल्याने त्याचे लवकर इन्फेक्शन होऊन पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. याशिवाय पावसाळ्यात अगदी भरपेट जेवण्यापेक्षा नेहमीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी जेवण करावे. - डॉ. नीरज गुजराथी, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ, नाशिक.