शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिवर्षी चुकला ना पूर, ना हटली पूररेषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:30 IST

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात.

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात. पडके वाडे, नदीपात्रालगत शिरणारे पाणी, खंडित होणारा विविध भागातील संपर्क हे सारे प्रश्न यंदाही आवासून उभे आहेत. गेल्या वर्षीच्या चर्चेनंतर त्यातील एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.गोदावरी नदीकाठी नाशिक शहर वसले असल्याने पुराचा धोका या शहराला कायमच होता. मात्र, शहर वाढत गेले आणि नदीपात्र संकुचित होत गेले. इतकेच नव्हे तर शहरातील वाघाडी, नासर्डी (नंदिनी) आणि वालदेवी या तीन नद्यांची अवस्थादेखील गोदावरी इतकीच दयनीय होत गेली. मग पावसाळा आला की पुराची भीती मनात दाटून येते. नाशिकमध्ये फार काही घडणार नाही, असे सर्व अंदाज चुकवत २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. शहरात यापूर्वी १९६९ मध्ये महापूर आला होता आणि त्याच्याच आठवणी जुन्या पिढीच्या स्मरणात होत्या. मात्र, निसर्गाला बाधक ठरणाºया चुका वाढत गेल्यानंतर २००८ मध्ये महापुराने त्याचा धडा दिला. निसर्गाने धडा दिला तरी नागरिक आणि यंत्रणांनी बोध मात्र घेतला नाही.नदीपात्रातील घरांना नोटिसा देणे, धोकादायक घर उतरवून घेण्याच्या नोटिसा देणे आणि पूर आल्यानंतर उपाययोजना या पलीकडे महापालिका कधी गेलीच नाही. अगदी २००८ च्या पुरानंतरदेखील महापालिकेने पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी एका शासकीय संस्थेच्या माध्यमातून सल्ला घेतला. मात्र त्यातील एकही सल्ला आजपर्यंत अमलात आलेला नाही. महापालिकेच्या महासभेत पावसाळ्याच्या दरम्यान जोरदार चर्चा झडतात. सूचनांचा वर्षाव होतो, परंतु त्याचा नंतर काहीच पाठपुरावा केला जात नाही.यंदा पावसाळा तोंडावर आला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महापालिकेत चर्चा झालेली नाही. प्रशासनाने आपल्या पातळीवर कामे केली असली तरी ही प्रशासकीय राजवटच असून, त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता हेच सर्वच प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतात. आता फक्त पावसाळ्यात काहीही घटना दुर्घटना घडली तर कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त मिळेल, इतकेच! बाकी दरवर्षीच्या समस्यांपासून नाशिककरांची सुटका नाहीच. (क्रमश:-----------------------सर्व समस्या ‘जैसे थे’ंनाशिक शहरात ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी सरकारवाड्याच्या काही पायºया बुडाल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर १९ सप्टेंबर २००८ मध्ये आलेल्या पुरातदेखील त्याची पुनरावृत्ती झाली. गेल्याच वर्षी १९६९च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण झाली तर आता २००८ च्या महापुराची सप्टेंबर महिन्यात तपपूर्ती होणार आहे. मात्र, यानंतरदेखील फार काही गांभीर्याने प्रश्न सोडवले गेलेले नाही. उलट सर्व समस्या जैसे थे आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक