शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

प्रतिवर्षी चुकला ना पूर, ना हटली पूररेषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:30 IST

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात.

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात. पडके वाडे, नदीपात्रालगत शिरणारे पाणी, खंडित होणारा विविध भागातील संपर्क हे सारे प्रश्न यंदाही आवासून उभे आहेत. गेल्या वर्षीच्या चर्चेनंतर त्यातील एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.गोदावरी नदीकाठी नाशिक शहर वसले असल्याने पुराचा धोका या शहराला कायमच होता. मात्र, शहर वाढत गेले आणि नदीपात्र संकुचित होत गेले. इतकेच नव्हे तर शहरातील वाघाडी, नासर्डी (नंदिनी) आणि वालदेवी या तीन नद्यांची अवस्थादेखील गोदावरी इतकीच दयनीय होत गेली. मग पावसाळा आला की पुराची भीती मनात दाटून येते. नाशिकमध्ये फार काही घडणार नाही, असे सर्व अंदाज चुकवत २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. शहरात यापूर्वी १९६९ मध्ये महापूर आला होता आणि त्याच्याच आठवणी जुन्या पिढीच्या स्मरणात होत्या. मात्र, निसर्गाला बाधक ठरणाºया चुका वाढत गेल्यानंतर २००८ मध्ये महापुराने त्याचा धडा दिला. निसर्गाने धडा दिला तरी नागरिक आणि यंत्रणांनी बोध मात्र घेतला नाही.नदीपात्रातील घरांना नोटिसा देणे, धोकादायक घर उतरवून घेण्याच्या नोटिसा देणे आणि पूर आल्यानंतर उपाययोजना या पलीकडे महापालिका कधी गेलीच नाही. अगदी २००८ च्या पुरानंतरदेखील महापालिकेने पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी एका शासकीय संस्थेच्या माध्यमातून सल्ला घेतला. मात्र त्यातील एकही सल्ला आजपर्यंत अमलात आलेला नाही. महापालिकेच्या महासभेत पावसाळ्याच्या दरम्यान जोरदार चर्चा झडतात. सूचनांचा वर्षाव होतो, परंतु त्याचा नंतर काहीच पाठपुरावा केला जात नाही.यंदा पावसाळा तोंडावर आला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महापालिकेत चर्चा झालेली नाही. प्रशासनाने आपल्या पातळीवर कामे केली असली तरी ही प्रशासकीय राजवटच असून, त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता हेच सर्वच प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतात. आता फक्त पावसाळ्यात काहीही घटना दुर्घटना घडली तर कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त मिळेल, इतकेच! बाकी दरवर्षीच्या समस्यांपासून नाशिककरांची सुटका नाहीच. (क्रमश:-----------------------सर्व समस्या ‘जैसे थे’ंनाशिक शहरात ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी सरकारवाड्याच्या काही पायºया बुडाल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर १९ सप्टेंबर २००८ मध्ये आलेल्या पुरातदेखील त्याची पुनरावृत्ती झाली. गेल्याच वर्षी १९६९च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण झाली तर आता २००८ च्या महापुराची सप्टेंबर महिन्यात तपपूर्ती होणार आहे. मात्र, यानंतरदेखील फार काही गांभीर्याने प्रश्न सोडवले गेलेले नाही. उलट सर्व समस्या जैसे थे आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक