शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिवर्षी चुकला ना पूर, ना हटली पूररेषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:30 IST

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात.

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात. पडके वाडे, नदीपात्रालगत शिरणारे पाणी, खंडित होणारा विविध भागातील संपर्क हे सारे प्रश्न यंदाही आवासून उभे आहेत. गेल्या वर्षीच्या चर्चेनंतर त्यातील एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.गोदावरी नदीकाठी नाशिक शहर वसले असल्याने पुराचा धोका या शहराला कायमच होता. मात्र, शहर वाढत गेले आणि नदीपात्र संकुचित होत गेले. इतकेच नव्हे तर शहरातील वाघाडी, नासर्डी (नंदिनी) आणि वालदेवी या तीन नद्यांची अवस्थादेखील गोदावरी इतकीच दयनीय होत गेली. मग पावसाळा आला की पुराची भीती मनात दाटून येते. नाशिकमध्ये फार काही घडणार नाही, असे सर्व अंदाज चुकवत २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. शहरात यापूर्वी १९६९ मध्ये महापूर आला होता आणि त्याच्याच आठवणी जुन्या पिढीच्या स्मरणात होत्या. मात्र, निसर्गाला बाधक ठरणाºया चुका वाढत गेल्यानंतर २००८ मध्ये महापुराने त्याचा धडा दिला. निसर्गाने धडा दिला तरी नागरिक आणि यंत्रणांनी बोध मात्र घेतला नाही.नदीपात्रातील घरांना नोटिसा देणे, धोकादायक घर उतरवून घेण्याच्या नोटिसा देणे आणि पूर आल्यानंतर उपाययोजना या पलीकडे महापालिका कधी गेलीच नाही. अगदी २००८ च्या पुरानंतरदेखील महापालिकेने पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी एका शासकीय संस्थेच्या माध्यमातून सल्ला घेतला. मात्र त्यातील एकही सल्ला आजपर्यंत अमलात आलेला नाही. महापालिकेच्या महासभेत पावसाळ्याच्या दरम्यान जोरदार चर्चा झडतात. सूचनांचा वर्षाव होतो, परंतु त्याचा नंतर काहीच पाठपुरावा केला जात नाही.यंदा पावसाळा तोंडावर आला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महापालिकेत चर्चा झालेली नाही. प्रशासनाने आपल्या पातळीवर कामे केली असली तरी ही प्रशासकीय राजवटच असून, त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता हेच सर्वच प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतात. आता फक्त पावसाळ्यात काहीही घटना दुर्घटना घडली तर कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त मिळेल, इतकेच! बाकी दरवर्षीच्या समस्यांपासून नाशिककरांची सुटका नाहीच. (क्रमश:-----------------------सर्व समस्या ‘जैसे थे’ंनाशिक शहरात ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी सरकारवाड्याच्या काही पायºया बुडाल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर १९ सप्टेंबर २००८ मध्ये आलेल्या पुरातदेखील त्याची पुनरावृत्ती झाली. गेल्याच वर्षी १९६९च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण झाली तर आता २००८ च्या महापुराची सप्टेंबर महिन्यात तपपूर्ती होणार आहे. मात्र, यानंतरदेखील फार काही गांभीर्याने प्रश्न सोडवले गेलेले नाही. उलट सर्व समस्या जैसे थे आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक