शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

प्रतिवर्षी चुकला ना पूर, ना हटली पूररेषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:30 IST

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात.

नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात. पडके वाडे, नदीपात्रालगत शिरणारे पाणी, खंडित होणारा विविध भागातील संपर्क हे सारे प्रश्न यंदाही आवासून उभे आहेत. गेल्या वर्षीच्या चर्चेनंतर त्यातील एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.गोदावरी नदीकाठी नाशिक शहर वसले असल्याने पुराचा धोका या शहराला कायमच होता. मात्र, शहर वाढत गेले आणि नदीपात्र संकुचित होत गेले. इतकेच नव्हे तर शहरातील वाघाडी, नासर्डी (नंदिनी) आणि वालदेवी या तीन नद्यांची अवस्थादेखील गोदावरी इतकीच दयनीय होत गेली. मग पावसाळा आला की पुराची भीती मनात दाटून येते. नाशिकमध्ये फार काही घडणार नाही, असे सर्व अंदाज चुकवत २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. शहरात यापूर्वी १९६९ मध्ये महापूर आला होता आणि त्याच्याच आठवणी जुन्या पिढीच्या स्मरणात होत्या. मात्र, निसर्गाला बाधक ठरणाºया चुका वाढत गेल्यानंतर २००८ मध्ये महापुराने त्याचा धडा दिला. निसर्गाने धडा दिला तरी नागरिक आणि यंत्रणांनी बोध मात्र घेतला नाही.नदीपात्रातील घरांना नोटिसा देणे, धोकादायक घर उतरवून घेण्याच्या नोटिसा देणे आणि पूर आल्यानंतर उपाययोजना या पलीकडे महापालिका कधी गेलीच नाही. अगदी २००८ च्या पुरानंतरदेखील महापालिकेने पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी एका शासकीय संस्थेच्या माध्यमातून सल्ला घेतला. मात्र त्यातील एकही सल्ला आजपर्यंत अमलात आलेला नाही. महापालिकेच्या महासभेत पावसाळ्याच्या दरम्यान जोरदार चर्चा झडतात. सूचनांचा वर्षाव होतो, परंतु त्याचा नंतर काहीच पाठपुरावा केला जात नाही.यंदा पावसाळा तोंडावर आला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महापालिकेत चर्चा झालेली नाही. प्रशासनाने आपल्या पातळीवर कामे केली असली तरी ही प्रशासकीय राजवटच असून, त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता हेच सर्वच प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतात. आता फक्त पावसाळ्यात काहीही घटना दुर्घटना घडली तर कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त मिळेल, इतकेच! बाकी दरवर्षीच्या समस्यांपासून नाशिककरांची सुटका नाहीच. (क्रमश:-----------------------सर्व समस्या ‘जैसे थे’ंनाशिक शहरात ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी सरकारवाड्याच्या काही पायºया बुडाल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर १९ सप्टेंबर २००८ मध्ये आलेल्या पुरातदेखील त्याची पुनरावृत्ती झाली. गेल्याच वर्षी १९६९च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण झाली तर आता २००८ च्या महापुराची सप्टेंबर महिन्यात तपपूर्ती होणार आहे. मात्र, यानंतरदेखील फार काही गांभीर्याने प्रश्न सोडवले गेलेले नाही. उलट सर्व समस्या जैसे थे आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक