शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

कुणी जागा देता का जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:42 IST

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देघोटीला भाजी मार्केटवर प्रश्नचिन्ह : कोरोनाच्या भीतीमुळे जागा देण्यास विरोध

नांदूरवैद्य : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप गुळवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी जागेसाठी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाºया घोटी येथे तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतो; परंतु कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी इगतपुरीचे आमदार खोसकर व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुळवे यांनी शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बाजार समिती बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कष्टाने पिकवलेला टोमॅटो, कोबी, वांगी, बटाटे आदी भाजीपाला घरातच पडून असल्यामुळे शेतकºयांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून कोरोना साथ संपेपर्यंत स्थानिक दोन ते चार व्यापाºयांनी मिळून शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पोहोच करावा. यामुळे स्थानिक शेतकºयांच्या मालाचे नुकसान न होता त्यांना आर्थिक हातभार लागेल, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनीसांगितले.कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकºयांच्या घरात पडून राहिलेला माल खराब होत असल्यामुळे जनावरांसमोर टाकण्यात आल्याचे यावेळी सांगितले. बाजार समितीने त्वरित जागेची व्यवस्था करावी शेतमालाचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही शेतकºयांना भाजीपाला एकाच ठिकाणी विक्र ी करता यावा यासाठी चार ते पाच ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जागा देण्यास विरोध होत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत दोन ते चार व्यापाºयांनी शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पाठवावा, अशी ठरविण्यात आले असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी