शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

कुणी जागा देता का जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:42 IST

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देघोटीला भाजी मार्केटवर प्रश्नचिन्ह : कोरोनाच्या भीतीमुळे जागा देण्यास विरोध

नांदूरवैद्य : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप गुळवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी जागेसाठी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाºया घोटी येथे तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतो; परंतु कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी इगतपुरीचे आमदार खोसकर व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुळवे यांनी शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बाजार समिती बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कष्टाने पिकवलेला टोमॅटो, कोबी, वांगी, बटाटे आदी भाजीपाला घरातच पडून असल्यामुळे शेतकºयांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून कोरोना साथ संपेपर्यंत स्थानिक दोन ते चार व्यापाºयांनी मिळून शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पोहोच करावा. यामुळे स्थानिक शेतकºयांच्या मालाचे नुकसान न होता त्यांना आर्थिक हातभार लागेल, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनीसांगितले.कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकºयांच्या घरात पडून राहिलेला माल खराब होत असल्यामुळे जनावरांसमोर टाकण्यात आल्याचे यावेळी सांगितले. बाजार समितीने त्वरित जागेची व्यवस्था करावी शेतमालाचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही शेतकºयांना भाजीपाला एकाच ठिकाणी विक्र ी करता यावा यासाठी चार ते पाच ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जागा देण्यास विरोध होत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत दोन ते चार व्यापाºयांनी शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पाठवावा, अशी ठरविण्यात आले असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी