शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुणी जागा देता का जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:42 IST

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देघोटीला भाजी मार्केटवर प्रश्नचिन्ह : कोरोनाच्या भीतीमुळे जागा देण्यास विरोध

नांदूरवैद्य : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप गुळवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी जागेसाठी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाºया घोटी येथे तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतो; परंतु कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी इगतपुरीचे आमदार खोसकर व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुळवे यांनी शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बाजार समिती बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कष्टाने पिकवलेला टोमॅटो, कोबी, वांगी, बटाटे आदी भाजीपाला घरातच पडून असल्यामुळे शेतकºयांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून कोरोना साथ संपेपर्यंत स्थानिक दोन ते चार व्यापाºयांनी मिळून शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पोहोच करावा. यामुळे स्थानिक शेतकºयांच्या मालाचे नुकसान न होता त्यांना आर्थिक हातभार लागेल, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनीसांगितले.कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकºयांच्या घरात पडून राहिलेला माल खराब होत असल्यामुळे जनावरांसमोर टाकण्यात आल्याचे यावेळी सांगितले. बाजार समितीने त्वरित जागेची व्यवस्था करावी शेतमालाचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही शेतकºयांना भाजीपाला एकाच ठिकाणी विक्र ी करता यावा यासाठी चार ते पाच ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जागा देण्यास विरोध होत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत दोन ते चार व्यापाºयांनी शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पाठवावा, अशी ठरविण्यात आले असे गुंजाळ यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी