शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

डॉक्टरांनी समाजातील वंचितांपर्यंत पोहचावे

By admin | Updated: May 22, 2015 22:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पदवीप्रदान सोहळ्यात प्रतिपादन

 नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असले तरी त्यांचे समाजशिक्षण ही निरंतर प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्या समाजाने आपणाला शिक्षणाची संधी दिली त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो; त्यांचे ऋण फेडण्याचे कर्तव्य डॉक्टरांनी पार पाडले पाहिजे. पदवी घेताना ज्या मूल्यांची आपण शपथ घेतली त्याचे पालन पुढील आयुष्यात करण्यासाठी समाजातील वंचित घटकांपर्यंत डॉक्टरांनी पोहचले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षक प्रबोधिनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्र-कुलपती विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनंगट्टीवार, पालकमंत्री गिरीश महाजन, प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव काशीनाथ गरकळ तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रुग्णांची आणि देशाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. या शपथेचे पालन केले गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे किंबहूना त्यांची ही जबाबदारीच आहे. आपला देश हा तरुणांचा देश आहे. या तरुणांच्या भरवशावर भारत उद्याची महासत्ता होऊ शकते. त्यामुळे तरुणांकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. देशाचे सरासरी वय २५ वर्ष असल्याने देशाला फार मोठी संधी आहे. ही संधी या तरुणांच्या रूपाने देश पाहत असल्याचेही फडणवीस म्हणाले. आज देशातील ४० टक्के बालके हे कमी वजनाचे जन्माला येतात, याचाच अर्थ कुपोषण घालविण्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधेची आणि संशोधनाचीही गरज आहे. विद्यापीठांचे कामच मुळी संशोधनाला चालना देणे असे आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नातेदेखील समाजाशी एकरूप असेच असले पाहिजे. हे परस्पर पुरक संबंध असावेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्याचेदेखील मोठे आव्हान या डॉक्टांपुढे आहे. या क्षेत्रात आणखी काय करता येऊ शकते, ग्रामीण भागात सक्षम वैद्यकीय यंत्रणा कशी उभारता येईल याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. समाजातील गोरगरीब घटक, वंचित समाजासाठी आपण आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचेही यावेळी भाषणे झाली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा करण्याचा सेवाभाव डॉक्टरांनी जपला पाहिजे. अनेक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात सेवा करण्याचे टाळतात. काही डॉक्टर्स तर बंधपत्र न घेता ते रद्द करण्यासाठी पैसेदेखील मोजतात, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या कारकिर्दीचा आढावा सादर करताना विद्यापीठाने केलेले काम आणि मिळविलेले सन्मान याविषयी विवेचन केले. विद्यापीठ स्थापनेपासून असलेला मनुष्यबळाचा प्रश्न यावेळी जामकर यांनी उपस्थित केला. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेकडेदेखील त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यापीठच्या परीक्षा विभागासाठी स्वतंत्र परीक्षा भवन असावे, अशी मागणीदेखील जामकर यांनी यावेळी मांडली. विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचा आढावाही त्यांनी सादर केला. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.