शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शौचालय वापरता का? तरच उमेदवारी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज ...

जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी संबंधित इच्छुकाला शैाचालय वापरत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा ग्रामसेवकाने दिलेला ठराव, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र किंवा शौचालय वापरात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र इच्छुक उमेदवाराला जोडावे लागणार आहे.

आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन अपत्ये असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, जात वैधतेबाबतची हमी किंवा प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे स्वतंत्र बँक खाते, ठेकेदार नसल्याबाबतचे घोषणापत्र आदी अनेक छोटी-मोठी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. परंतु, नुसते शौचालय आहे म्हणून नव्हे तर शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

हागणदारीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अशा प्रकारचा नियम स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. गावांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आणि वापरासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्जासाठी नियम करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नियम व अटी यांची अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.