शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय वापरता का? तरच उमेदवारी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज ...

जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी संबंधित इच्छुकाला शैाचालय वापरत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा ग्रामसेवकाने दिलेला ठराव, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र किंवा शौचालय वापरात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र इच्छुक उमेदवाराला जोडावे लागणार आहे.

आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन अपत्ये असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, जात वैधतेबाबतची हमी किंवा प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे स्वतंत्र बँक खाते, ठेकेदार नसल्याबाबतचे घोषणापत्र आदी अनेक छोटी-मोठी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. परंतु, नुसते शौचालय आहे म्हणून नव्हे तर शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

हागणदारीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अशा प्रकारचा नियम स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. गावांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आणि वापरासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्जासाठी नियम करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नियम व अटी यांची अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.