शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

काम करा, अन्यथा शाल-श्रीफळ तयार

By admin | Updated: July 31, 2016 00:23 IST

अशोक चव्हाण : कॉँग्रेस बैठक : राष्ट्रवादीशी ‘संग’ नको, बैठकीतील सूर

नाशिक : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा सोडा, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला आधी आवरा. त्यांच्यासोबत आघाडी केल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला जात आहे. त्यांच्याशी अजिबात आघाडी करता कामा नये, असा सूर जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केला. त्यावर आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते करा. मात्र आगामी काळात पक्ष मजबूत झाला पाहिजे, नाही तर मी शाल व श्रीफळ विकत घेऊन ठेवले असून, पक्ष मजबूत झाला नाही तर शाल-श्रीफळ देऊन मोकळे करेल, असा परखड इशारा त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.हॉटेल ग्रीन व्ह्णू येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्णातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बहुतांश तालुकाध्यक्षांनी तसेच लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीशी आघाडी नको, असा सूर लावला. नाशिक तालुकाध्यक्ष नियुक्तीवरून प्रल्हाद जाधव यांनी ४० वर्षांपासून काम करतो आहे, अजून तालुकाध्यक्ष कोण ते माहीत नाही, असा घरचा अहेर दिला. लक्ष्मण मंडाले यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडला जात असल्याने भविष्यात या मतदारसंघात पंजा चिन्ह राहील की नाही, असे सांगितले. अरुण अहेर यांनी तर येवला तालुक्यातील माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कशाप्रकारे दहशत केली. कसे उमेदवार पळविले. कसे कामे देऊन कॉँग्रेसचे पदाधिकारी फोडले, याचे वर्णन करत आता तरी पक्षश्रेष्ठींनी जागे व्हावे, असा सूर लावला. प्रकाश शिंदे यांनी दिंडोरीत कॉँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचे व नगराध्यक्ष कॉँग्रेसचा असल्याचे सांगितले, तर चांदवडमध्ये शिरीषकुमार कोतवालांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत विजय मिळविता येईल, अशी अपेक्षा शंकरराव गांगुर्डे यांनी व्यक्त केली. बागलाणमध्ये पक्ष मजबूत असून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम केले तर राष्ट्रवादीचा विषयच राहणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले. निफाडमध्ये दहा गट असून, पक्षाने चांगले उमेदवार व पाठबळ दिल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली परिस्थिती राहील, असे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांनी सांगितले. सिन्नरला कॉँग्रेसची परिस्थिती चांगली राहील, माणिकराव आले आणि गेले तरी कॉँग्रेस तेथेच आहे, असे विनायक सांगळे व रामराव शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी).