शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती तत्काळ करा !

By धनंजय रिसोडकर | Updated: September 8, 2023 19:26 IST

अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. ०८) सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. करोडो रुपये खर्च करुन उभारलेल्या रस्त्यासह उड्डाणपुलाच्या दुरावस्थेची कारणे काय ? असा जाब विचारत तत्काळ देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.

अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते. इंदिरानगर अंडरपासच्या येथे पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना रस्त्याची अशी दुरावस्था का झाली, असा प्रश्न आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली नव्हती का ? असा प्रश्न विचारताना मेंटेन्स केलेला असताना रस्त्याची दुरावस्था कशी होते ? असा प्रश्नही त्यांनी प्रकल्प संचालक यांना विचारला.

मुंबईत नाशिकच्या पेक्षा जास्त पाऊस असताना नाशिकच्या रस्त्याची दुरावस्था होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. उड्डाणपुलाचे सर्व पाईप बदलून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. याबाबत ८ दिवसात कार्यवाही करून सुधारणा करण्याची मागणी करतानाच महामार्गाच्या दुरावस्थाबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प संचालक यांना दिले. तसेच याबाबत ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.