शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती करा, शेतीपूरक व्यवसायामध्ये उद्योजक व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती ...

येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती तज्ज्ञ कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सदूभाऊ शेळके यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी शेळके प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वेद, आयुर्वेदातून शेतीतील पिके व उत्पादन याविषयी अभ्यास करून आपण शेतीतून उत्पन्न वाढविलेे. सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या उत्पादनाचे स्वतः विपणन केले, मागणीप्रमाणे पिकांचे उत्पादन घेतले. त्यामुळे आपल्याला शेतीतून मोठा आर्थिक फायदा झाला व आपली आर्थिक स्थिती उन्नत झाली असे सदूभाऊ शेळके यांनी यावेळी आपले अनुभव कथन करतांना सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, युवकांनी चिकाटी, ध्येयनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा अंगी बाणवणे महत्त्वाचे असून युवकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक अरुण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन गुगल मीटवर हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख मनीषा गायकवाड यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. कैलास बच्छाव यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले, तर आभार प्रा. कविता कानडे यांनी मानले.

----------------

स्वतः पिकवलेला भाजीपाला, धान्य स्वतः पॅकिंग करून विकल्या पाहिजेत. त्यातून अधिक नफा मिळतो. त्यासाठी ट्रेडमार्क, ॲगमार्क आपणास घेता येतो. स्वतःच्या शेतीत राबूनही शेतीपूरक उद्योग आपण उभारू शकतो व उद्योजक बनू शकतो. आपण स्वतः जात्यावरचे पीठ, लाकडी घाण्यावरचे तेल असे अनेक शेतीपूरक उद्योग चालवतो व त्यातून निर्मित उत्पादनांना अनेक चित्रपट कलाकार व सेलिब्रेटिजची पसंती आहे. मागणी आहे, असेही शेळके यांनी सांगितले. पैसे भरून नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय युवकांनी करावा. कोणत्याही कामाची, विक्रीची लाज वाटू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला.