शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सेंद्रिय शेती करा, शेतीपूरक व्यवसायामध्ये उद्योजक व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती ...

येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती तज्ज्ञ कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सदूभाऊ शेळके यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी शेळके प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वेद, आयुर्वेदातून शेतीतील पिके व उत्पादन याविषयी अभ्यास करून आपण शेतीतून उत्पन्न वाढविलेे. सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या उत्पादनाचे स्वतः विपणन केले, मागणीप्रमाणे पिकांचे उत्पादन घेतले. त्यामुळे आपल्याला शेतीतून मोठा आर्थिक फायदा झाला व आपली आर्थिक स्थिती उन्नत झाली असे सदूभाऊ शेळके यांनी यावेळी आपले अनुभव कथन करतांना सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, युवकांनी चिकाटी, ध्येयनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा अंगी बाणवणे महत्त्वाचे असून युवकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक अरुण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन गुगल मीटवर हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख मनीषा गायकवाड यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. कैलास बच्छाव यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले, तर आभार प्रा. कविता कानडे यांनी मानले.

----------------

स्वतः पिकवलेला भाजीपाला, धान्य स्वतः पॅकिंग करून विकल्या पाहिजेत. त्यातून अधिक नफा मिळतो. त्यासाठी ट्रेडमार्क, ॲगमार्क आपणास घेता येतो. स्वतःच्या शेतीत राबूनही शेतीपूरक उद्योग आपण उभारू शकतो व उद्योजक बनू शकतो. आपण स्वतः जात्यावरचे पीठ, लाकडी घाण्यावरचे तेल असे अनेक शेतीपूरक उद्योग चालवतो व त्यातून निर्मित उत्पादनांना अनेक चित्रपट कलाकार व सेलिब्रेटिजची पसंती आहे. मागणी आहे, असेही शेळके यांनी सांगितले. पैसे भरून नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय युवकांनी करावा. कोणत्याही कामाची, विक्रीची लाज वाटू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला.