शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे पारंपरिक वाण वाया घालवू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:03 IST

पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराहीबाई पोपरे : मुक्त विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ

नाशिक : पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि.२०) कृषी तंत्रज्ञान महोत्सवास सुरुवात झालीय याप्रसंगी राहीबाई बोपरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन होते. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, नाशिकचे विभागीय वनाधिकारी श्याम रनाळकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नैसर्गिक पद्धतीने गावरान बी-बियाणांचा वापर, प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेणाºया व आदिवासी परिसरातून ५४ पिकांचे ११६ जातींचे गावरान वाणाचे जतन करून संवर्धन करणाºया राहीबाई पोपरे यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सवातून शेतकºयांना मार्गदर्शन के ले. त्या म्हणाल्या, रासायनिक खते न वापरता नैसर्गिक पद्धतीतून येणारी पिके आपल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी महत्त्वाची आहे. गावरान बियाणांचे जतन केले नाही, तर पुढच्या पिढ्यांना ती फोटोतूनच दाखवावी लागतील, पारसबागेत घरगुती गावरान पद्धतीने भाजीपाला पिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यातूनच जुन्या गावरान बियाणांच्या वाणांच्या संग्रहाची गोडी लागली आणि हळूहळू या पारंपरिक वाणांचे महत्त्व लक्षात आल्याने त्यातूनच ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण जतन करता आल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, की अल्पभुधारक शेतकºयांनी निराश न होता अशा पद्धतीच्या प्रयोगातून स्वत:ला समृद्ध करावे. यातूनच प्रगतीचे रस्ते सापडतील. डॉ. दिनेश भोंडे यांनी बांबू लागवड आणि त्याच्या प्रयोगासंदर्भात मार्गदर्शन केले. श्याम रनाळकर यांनी सामाजिक वनीकरणाचे महत्त्व सांगितले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्याम पाटील यांनी आभार मानले.(आर फोटो-२० वायसीएमओयू)

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ