शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आठवीपर्यंत नापास करायचं नाही, अन् सरपंच सातवी पास असला पाहिजे!

By admin | Updated: July 4, 2017 23:39 IST

सिन्नर : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत नापास करायचे नाही असा निर्णय अंमलात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असा निर्णय २०१० पासून अंमलात आला आहे. त्यामुळे २०१० पासून शाळेत जाणारा कोणताही विद्यार्थी आठवी नापास नाही. असे असताना मंत्रिमंडळाने थेट सरपंच निवडीसाठी उमेदवार सातवी पास असला पाहिजे असा निकष लावला आहे. या निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात थेट जनतेतून सरपंच निवड केली जाते. या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांची थेट जनतेतून सरपंच निवडीचे स्वागत केले; मात्र त्यासाठी शिक्षणाचा लावण्यात आलेला निकष चर्चेचा विषय बनला. १९९६ ते २००९ म्हणजे या १४ वर्षांच्या काळात जे सातवी नापास असतील किंवा शाळेत गेलेच नसतील अशाच व्यक्ती सरपंच होऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे. २०१० नंतर शाळेत जाणारे सर्व विद्यार्थी आठवीपर्यंत नापास करायचे नाही असा कायदाच आहे. त्यामुळे थेट सरपंच निवडीसाठी लावण्यात आलेला सातवी पासचा निकष चर्चेचा विषय झाला नाही तरच नवल!