शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:18 IST

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याला जाऊ न देता ते महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीवर एकदरा परिसरात धरण बांधून ते पाणी गंगापूर धरणाकडे वळविण्याच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता ज्यांच्या बांधावर हा प्रकल्प उभा राहणार आहे ते आदिवासी शेतकरी मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत.

पेठ : महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याला जाऊ न देता ते महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीवर एकदरा परिसरात धरण बांधून ते पाणी गंगापूर धरणाकडे वळविण्याच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता ज्यांच्या बांधावर हा प्रकल्प उभा राहणार आहे ते आदिवासी शेतकरी मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत. तर यावर सोशल मीडियातून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भाजपाचे जिल्हास्तरीय सदस्य डॉ. प्रशांत भदाणे यांनी एकदरे, हनुमंतपाडा, उस्थळे, हेदपाडा, भोयेपाडा, देवगाव या परिसरातील शेतकरी व नागरिकांना एकत्र करून एकदरे दमणगंगा धरण संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने तहसील कार्यालयात संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन या प्रकल्पाची संपूर्ण प्रक्रिया व शासनाचे धोरण समजून घेतल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही तसेच स्थानिक जनतेच्या पुनर्वसनाचे काय व कसे ? असे अनेक प्रश्न स्थानिकांच्या डोक्यात घर करून बसले आहेत.  संघर्ष समिती स्थापन करताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या कुबड्या लावून घेऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जात असली तरी स्वत: प्रशांत भदाणे सत्ताधारी भाजपाचे सदस्य आहेत. एवढे असूनही त्यांनी पक्षाला बाजूला ठेवून स्थानिक शेतकºयांना एकत्र करण्याचे धारिष्ट्य दाखवले. यासाठी भदाणे यांना पक्ष व जनता या दोघांच्या कसोटीत पास होण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परिसरातील तरुण कार्यकर्त्यांच्या मते हा प्रकल्प म्हणजे स्थानिक जनतेला देशोधडीला लावणारा प्रकल्प  असून, यामध्ये कोणत्याही पक्षाने आपला राजकीय स्वार्थाचा  किंवा पक्ष संघटनेचा विचार न करता या प्रकल्पाला कडाडून विरोध करावा.

टॅग्स :Waterपाणी