शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

जातीचे महत्त्व आम्हाला सांगू नका!

By admin | Updated: May 11, 2015 04:58 IST

‘ज्ञानपीठ’विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वाद अद्याप शमण्यास तयार नाहीत. नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये जातिव्यवस्थेचे समर्थन केले होते.

नाशिक : ‘ज्ञानपीठ’विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वाद अद्याप शमण्यास तयार नाहीत. नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये जातिव्यवस्थेचे समर्थन केले होते. त्यावरून आता मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नेमाडे यांच्यावर टीका केली आहे. ‘नेमाडे, जातीचे महत्त्व आम्हाला सांगू नका’ अशी तंबी देतानाच नेमाडे हे प्रस्थापितांना विकले गेले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना डॉ. कोत्तापल्ले यांनी सध्याच्या परिवर्तनवादी चळवळीच्या परिस्थितीविषयी सखोल चिंतन केले. त्यात परिवर्तनवाद्यांच्या विरोधात बोलण्यासाठी भांडवलशाही व्यवस्थेकडून विद्वान माणसे विकत घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच नेमाडे यांच्या वक्तव्याचा समाचारही घेतला. ते म्हणाले, ‘मध्यंतरी जातिव्यवस्था महत्त्वाची आहे, आपल्या संस्कृतीचा तो गाभा आहे, प्रत्येकाने आपल्या जातीवर प्रेम करावे, असे काहीतरी नेमाडे बोलले. त्यांना मी कवी दुष्यंतकुमारांच्या शब्दांत एवढेच सांगेल की, ज्या घोड्याच्या तोंडात लगाम लावलेला असतो, तोच लोखंडाची खरी चव सांगू शकतो. नेमाडेंनी आम्हाला जातीचे महत्त्व सांगू नये. जातीने आम्हाला किती होरपळून टाकले आहे, हे त्यांना माहीत नसावे. हा सगळा मी आधी बोलल्याप्रमाणे खरेदी-विक्रीचाच प्रकार आहे.’ भालचंद्र नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी देशातील पूर्वीच्या तिव्यवस्थेचे समर्थन केले होते. त्यावर पुरोगामी संघटनांकडून विरोधाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. घुमान येथे ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यावरूनही नेमाडे व डॉ. कोत्तापल्ले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.