शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका.

By admin | Updated: March 9, 2015 01:18 IST

भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका.

नाशिक : ‘आमच्या काळात असे नव्हते... आम्ही एवढा अभ्यास करायचो... आम्ही दहा रुपयांच्या मिसळीवर दिवस काढले’ वगैरे अशा भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका. त्यामुळे मुलांना तुमची सहानुभूती वाटण्याऐवजी कीवच वाटेल. मुलांसोबत वर्तमानात जगा आणि त्यांच्या भविष्यकाळाची स्वप्ने पाहा, असा सल्ला प्रख्यात बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी पालकांना दिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात तांबे यांनी ‘अभ्यास आणि वाचन’ तसेच ‘परीक्षेला सामोरे जाताना...’ या विषयावर आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पालकांनी भूतकाळ उगाळलेला मुलांना आवडत नाही. तो काळ संपलेला असतो आणि मुलांनी तो पाहिलेला नसतो. त्यात त्यांना अजिबात रस नसतो. आपली मुले हुशार आहेत, हे पालकांना माहीत नसते. ते त्यांच्या पाठीवर कधी शाबासकीची थाप देत नाहीत. सॉफ्टवेअरच्या भाषेत सांगायचे झाले तर पालक ‘विंडोज् ९५’मध्ये असतात आणि मुले ‘विंडोज ७’पर्यंत पोहोचलेली असतात. त्यामुळे पालकांनी ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे. आपली वृत्ती बदलायची असेल, तर विचार बदलावे लागतील. विचार बदलायचे असतील, तर भाषा बदलावी लागेल आणि भाषा बदलायची असेल, तर ‘इनपुट्स’ बदलावे लागतील, असे तांबे म्हणाले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तन्वी देवडे यांनी परिचय करून दिला. डॉ. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. ‘माझं ग्रंथालय’च्या बाल विभागाच्या समन्वयक स्वाती गोरवाडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)