शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका.

By admin | Updated: March 9, 2015 01:18 IST

भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका.

नाशिक : ‘आमच्या काळात असे नव्हते... आम्ही एवढा अभ्यास करायचो... आम्ही दहा रुपयांच्या मिसळीवर दिवस काढले’ वगैरे अशा भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका. त्यामुळे मुलांना तुमची सहानुभूती वाटण्याऐवजी कीवच वाटेल. मुलांसोबत वर्तमानात जगा आणि त्यांच्या भविष्यकाळाची स्वप्ने पाहा, असा सल्ला प्रख्यात बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी पालकांना दिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात तांबे यांनी ‘अभ्यास आणि वाचन’ तसेच ‘परीक्षेला सामोरे जाताना...’ या विषयावर आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पालकांनी भूतकाळ उगाळलेला मुलांना आवडत नाही. तो काळ संपलेला असतो आणि मुलांनी तो पाहिलेला नसतो. त्यात त्यांना अजिबात रस नसतो. आपली मुले हुशार आहेत, हे पालकांना माहीत नसते. ते त्यांच्या पाठीवर कधी शाबासकीची थाप देत नाहीत. सॉफ्टवेअरच्या भाषेत सांगायचे झाले तर पालक ‘विंडोज् ९५’मध्ये असतात आणि मुले ‘विंडोज ७’पर्यंत पोहोचलेली असतात. त्यामुळे पालकांनी ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे. आपली वृत्ती बदलायची असेल, तर विचार बदलावे लागतील. विचार बदलायचे असतील, तर भाषा बदलावी लागेल आणि भाषा बदलायची असेल, तर ‘इनपुट्स’ बदलावे लागतील, असे तांबे म्हणाले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तन्वी देवडे यांनी परिचय करून दिला. डॉ. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. ‘माझं ग्रंथालय’च्या बाल विभागाच्या समन्वयक स्वाती गोरवाडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)