शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

ग्रामपंचायतींचे राजकीय आखाडे करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST

नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.

ठळक मुद्देसंजय राऊत : महाराष्ट्र सरपंच संसदेत प्रतिपादन

नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.नाशिक येथील चोपडा लॉन्समध्ये नाशिक लोकसभा मतदार संघ व एमआयटी आॅफ गव्हर्नमेंट यांच्या ग्रामोन्नीतीतून देशोन्नती संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सरपंच परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपट पवार, एमआयटी स्कूलचे संचालक राहुल कराड, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, एमव्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालिनी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शहराध्यक्ष सचिन मराठे, महेश बडवे आदी उपस्थित होते.संजय राऊत म्हणाले, प्रशिक्षित सरपंच असतील तरच आदर्श गावांची निर्मिती होऊ शकेल आणि आदर्श गाव स्पर्धा यासारख्या स्पर्धांची गरज उरणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायती राजकारणाचे आखाडे न होता ग्रामीण विकासाची केंद्रे बनली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, सहकार खात्यात विकासात्मक कामाचे नियोजन करण्यापेक्षा अनेक नकारात्मक गोष्टी असल्याने आपण विनंती करून सहकार खात्यापासून स्वत:ची मुक्तता करून घेतल्याचा गौप्यस्फोट करतानाच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यामुळे पुन्हा आपल्याला ग्रामविकास राज्यमंत्रिपद मिळाल्याचे दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराष्टÑात २०० गावे दुष्काळी यंदा गत शंभर वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ राहणार असल्याचे सांगतानाच देशातील १४ राज्यांमधील ३४० जिल्ह्णांमध्ये पाण्याचा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रातही दोनशे गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट असून, आत्तापासून पाण्याचे नियोजन करावे लागेल. आगामी काळात जगासमोर पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचन व जनावरांच्या पाण्याचा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.वनविभागाच्या जागा हस्तांतरितराज्यातील दुष्काळी परिस्थिच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाच्या परिसरातील एक हेक्टरपर्यंतच्या जागा ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्याच्या सूचना वनविभागांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत संबंधित भूखंड ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.