शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पुन्हा धावू द्या झुक झुक गाडी !

By admin | Updated: February 17, 2017 00:13 IST

कॉँग्रेसचा नॉस्टॉल्जिया : १९९२ मधील प्रस्तावित महापौर एक्स्प्रेसचे यंदाच्या जाहीरनाम्यात आश्वासन

 नाशिक : १९९२ मध्ये नाशिक महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता आली त्यावेळी चर्चेत असलेल्या नदीकाठच्या मनोरंजक महापौर एक्स्प्रेसचे स्वप्न तेव्हा पूर्ण झाले नाही, परंतु आता हेच स्वप्न साकार करण्यासाठी कॉँग्रेस सज्ज झाली आहे. महापालिकेने यंदाच्या जाहीरनाम्यात महापौर एक्स्प्रेसचे स्मरण करून दिले आहे, त्याचप्रमाणे पालिकेत सुरुवातीची दहा वर्षे सत्ता असताना कॉँग्रेसच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले त्याची स्मरणचित्रे जाहीरनाम्यात देताना हा पक्ष नॉस्टॉल्जियात रमला आहे.कॉँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे गुरुवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात अनेक जुन्या योजनांना उजाळा देण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीनंतर १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्यातील १९९२ ते १९९५ आणि नंतर ९६-९७ या कालावधीत कॉँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर दोन वर्षे शिवसेना-भाजपा युतीकडे सत्ता गेली आणि १९९९ ते २००२ पर्यंत कॉँग्रेसकडे सत्ता आली. या दहा वर्षांच्या कारकिर्दीत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके आणि बौद्ध स्मारक तसेच पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण, गोदावरी कृती योजना तसेच स्व. दादासाहेब गायकवाड सभागृह यांची आपण बांधणी केली, परंतु आता या प्रकल्पांची दुरवस्था झाल्याचे नमूद करण्यात आली आहे. आमची दहा वर्षे, तुमची पंधरा वर्षे या अशा मथळ्याखाली त्यांनी ही चित्रे दिली असून त्यात ‘आम्ही साकारलेल्या प्रकल्पाची तुम्ही केली दुरवस्था’ असे त्यात म्हटले आहे.या नॉस्टॉल्जियाशिवाय कॉँग्रेसने १९९२ साली कॉँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यावेळी अशोकस्तंभ ते सोमेश्वर दरम्यान महापौर एक्स्प्रेस सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता, परंतु त्यावेळी वादविवादानंतर हा विषय बाजूला पडला होता. आता या योजनेचे विस्तारीकरण करून एकलहरे ते मुक्त विद्यापीठापर्यंत कॅनॉलमार्गाने महापौर एक्स्प्रेस सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.नाशिक शहरातील गावठाण भागात चार चटई क्षेत्र असावे, या १९९७ सालच्या मागणीलाही जाहीरनाम्यात पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. याशिवाय गावठाण भागातील लाल किंवा निळी पूररेषाच नसावी, असे अजब आश्वासन देण्यात आले आहे. तसेच बससेवेचा रागही आळवण्यात आला आहे.तसेच शहरात स्काय वॉक, बहुमजली वाहनतळे, सौर शहर, बर्ड पार्क, बीओटीवर एलईडी दिवे, पवन ऊर्जा केंद्र, शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक अशा काही नव्या योजनांचा समावेश करण्यात आला असला तरी बाकी अन्य अनेक योजना त्याच त्या आहेत.