शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

निकाल लागूनही शुल्क परतीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:34 IST

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भटके विमुक्त वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जादा शुल्क परत करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही शुल्क परतीची कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, निकाल १ मार्चला जाहीर होऊनही शब्द पाळण्यात आला नसल्याचा आरोप भटके विमुक्त महासंघाने केला आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भटके विमुक्त वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जादा शुल्क परत करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही शुल्क परतीची कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, निकाल १ मार्चला जाहीर होऊनही शब्द पाळण्यात आला नसल्याचा आरोप भटके विमुक्त महासंघाने केला आहे.  तीन महिन्यांपूर्वी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये भटके विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्काची सवलत असतानाही त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गाप्रमाणे शुल्क वसूल करण्यात आले होते. सदर बाब महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या लक्षात आल्यानंतर महासंघाने शुल्क आकारण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अशी मागणी केली होती. शासनाच्या वतीने गेल्या डिसेंबर महिन्यात शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. शासनाच्या या निर्णयामुळे भटक्या विमुक्त उमेदवारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. वास्तविक शिक्षणसेवक म्हणून या चाचणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यापूर्वीच टीईटी चाचणी दिलेली आहे. त्या टीईटी झालेल्यांना चाचणी शुल्कामध्ये अनुसूचित जाती- जमातीप्रमाणे भटक्या विमुक्तांनाही परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली होती. मात्र, आता अभियोग्यता चाचणीला परीक्षा शुल्क सवलत नाकारण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यावेळी शासनाने आपली चूक मान्य करीत लवकरच विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा दिरंगाई केल्यामुळे महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शुल्क परतीची मागणी केली असता निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता १ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला असताना शुल्काबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाकडून दिशाभूलभटके विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांकडून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शुल्क आकारण्याची चूक मान्य करीत शासनाने जादाचे शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु शासनाने वेळोवेळी भूमिका बदलत अखेरीस निकालाच्या पूर्वीच शुल्क परत केले जाईल असे सांगितले होते. मात्र, हा शब्द फिरविण्यात आल्यामुळे समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे आणि शासनाला या प्रकरणाचे गांभीर्य नसावे असे दिसते.  - हेमंत शिंदे, अध्यक्ष,  महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघ

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी