शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

‘मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:35 IST

: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.

नाशिक : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.या पाच महिन्यांत शहरात तीन ठिकाणी जन्मलेल्या ‘नकोशी’ला बेवारस सोडून अज्ञात मातांनी पळ काढल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर जन्मदात्या आईनेच दहा दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटनांमुळे समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनी महिला सबलीकरणाचा जागर होत असताना फाळके स्मारक परिसरात नवजात बालिका आढळून आली होती. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदिनी नदीच्या काठावर मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले होते. या घटना मार्च महिन्यातच लागोपाठ घडल्या होत्या.त्यानंतर काही दिवसांनी सिडकोमधील बडदेनगरच्या एका सोसायटीत जेमतेम पाच ते सहा महिने वाढ झालेले मनुष्य जातीचे अर्भक अज्ञातांनी बेवारसपणे टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून गर्भपात करून अपत्य जन्माची लपवणूक करण्याकरिता अज्ञात स्त्रीने सहा महिने वाढ झालेले अर्भक बेवारसपणे फेकून पळ काढला होता.जन्मदात्रीकडून दाखविला गेला उकिरडामे महिन्याच्या १५ तारखेला भारतनगरजवळ वर्दळीच्या रस्त्यालगत एका कचºयाच्या उकिरड्यात स्त्री जातीचे नवजात शिशु एका महिलेला आढळून आले होते. देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते ते अगदी खरेच आहे, याची प्रचिती नाशिककरांना त्यावेळी आली. कारण जन्मदात्रीने नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर नवजात बाळाला जन्म देत थेट उकिरडा दाखविला. कडकडीत उन्हात सुमारे पाच तासांहून अधिक वेळ कचºयाच्या वेढ्यात वर्दळीच्या रस्त्यालगत निपचित पडलेल्या या बाळाला अखेर नियतीनेच जीवदान दिले. या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळाही डॉक्टरांनी दिला आहे़

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक