शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

‘मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:35 IST

: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.

नाशिक : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.या पाच महिन्यांत शहरात तीन ठिकाणी जन्मलेल्या ‘नकोशी’ला बेवारस सोडून अज्ञात मातांनी पळ काढल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर जन्मदात्या आईनेच दहा दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटनांमुळे समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनी महिला सबलीकरणाचा जागर होत असताना फाळके स्मारक परिसरात नवजात बालिका आढळून आली होती. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदिनी नदीच्या काठावर मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले होते. या घटना मार्च महिन्यातच लागोपाठ घडल्या होत्या.त्यानंतर काही दिवसांनी सिडकोमधील बडदेनगरच्या एका सोसायटीत जेमतेम पाच ते सहा महिने वाढ झालेले मनुष्य जातीचे अर्भक अज्ञातांनी बेवारसपणे टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून गर्भपात करून अपत्य जन्माची लपवणूक करण्याकरिता अज्ञात स्त्रीने सहा महिने वाढ झालेले अर्भक बेवारसपणे फेकून पळ काढला होता.जन्मदात्रीकडून दाखविला गेला उकिरडामे महिन्याच्या १५ तारखेला भारतनगरजवळ वर्दळीच्या रस्त्यालगत एका कचºयाच्या उकिरड्यात स्त्री जातीचे नवजात शिशु एका महिलेला आढळून आले होते. देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते ते अगदी खरेच आहे, याची प्रचिती नाशिककरांना त्यावेळी आली. कारण जन्मदात्रीने नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर नवजात बाळाला जन्म देत थेट उकिरडा दाखविला. कडकडीत उन्हात सुमारे पाच तासांहून अधिक वेळ कचºयाच्या वेढ्यात वर्दळीच्या रस्त्यालगत निपचित पडलेल्या या बाळाला अखेर नियतीनेच जीवदान दिले. या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळाही डॉक्टरांनी दिला आहे़

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक