शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:50 IST

येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देयेवला : प्रहार संघटनेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.थकीत वीजबिलापोटी शेतीपंपाची वीज तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. यास शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा विरोध आहे. शासनाने ही मोहीम त्वरित थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. वीजवसुली मोहीम अनैतिक असून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन का तोडण्यात आली याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता अरेरावी करीत शेतकऱ्यांवर ३५३ सारखे गुन्हे दाखल करून न्याय मागणाऱ्यांचीच मुस्कटदाबी केली जात आहे. चांदवडच्या शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, शंकर गायके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, नवनाथ लभडे, प्रहारचे बापू शेलार, रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, गोरख निर्मळ, बाळासाहेब बोराडे, जनार्दन गोडसे, धनंजय खरोटे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी