शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

संततधारेमुळे दारणा, भावली, काश्यपी, गौतमीच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 25, 2014 00:37 IST

बळीराजा सुखावला : जिल्ह्याच्या पश्चिमपट्ट्यात पावसाचा जोर

नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८४८ दलघफू (३२ टक्के) पाणीसाठा आहे, तर भावलीचा पाणीसाठा २८ वरून ५८३ दलघफू (४० टक्के) इतका झाला आहे.पश्चिमपट्ट्यात पावसाचा जोर कायम असून, त्यामुळे नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. गंगापूर धरणाला पाणीपुरवठा करणारी किकवी नदी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे शून्य टक्के असलेला काश्यपी धरणाचा पाणीसाठा २२ दलघफू झाला आहे. त्याचप्रमाणे अवघ्या ३५० दलघफूवर आलेला दारणा धरणाचा पाणीसाठा २८०३ (३९ टक्के) इतका झाला आहे. शून्य टक्के असलेला गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १७० दलघफू झाला आहे. वालदेवीही कोरडेठाक पडलेले असताना, आता संततधारेमुळे वालदेवी धरणात ९३ दलघफू पाणीसाठा झाला आहे. शून्यावरच गेलेले मुकणे धरणही आता हळूहळू भरू लागले असून, २३ जुलैअखेर मुकणे धरणात २६७ दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागातही काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)